शनिवार, २६ एप्रिल, २०१४
कॅलीडोस्कोप : १० - Breathing LIFE...................
कॅलीडोस्कोप : १०
Breathing LIFE...................
सुरुवातीला काहीसा नकोस वाटणारा हा अनुभव आता माझ्या आयुष्याचा एक भाग बनून गेलाय.
असा काय आहे या "आर्ट ऑफ लिव्हिंग" मध्ये; नुसताच श्वासांचा खेळ आहे? कि इतरांप्रमाणे थोतांड आहे?"
हे जाणून घेण्यासाठी आधी तुम्ही स्वतः या गोष्टी शिका.लोक काय बोलतात या पेक्षा स्वानुभव घ्या.
माझ्यासाठी म्हणाल तर हि कृष्णाची बासरी आहे. जेवढी ऐकाल तेवढी ओढ वाढत जाते.आणखीन जास्त खोलात जाऊन याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा लागून राहते.
आपल्या भारतात एवढे साधू-संत आहेत आणि त्यामधील काही लोक एवढ्या खालच्या पातळीला गेलेले आहेत कि आपल्याला या सगळ्यांबद्दल शंका येणे साहजिक आहे. (मी बंगलोर मध्ये असताना कुंडलिनी शक्ती जागृतीच्या एका बाबांच्या शिबीराला जाऊन आले होते. एका मातेची एक दिवसाची कार्यशाळा जाऊन पाहिली होती. दोन्ही अनुभव खूप वाईट होते) पण इथे येउन माझे मन नक्कीच संशय मुक्त झाले, कारण इथे स्वतःचे आयुष्य चांगले करून चांगला समाज निर्माण करण्यावर भर दिलेला आहे.
खरतर या लेख मालिकेत प्रत्येक दिवसाची इत्यंभूत माहिती देऊन मी माझी लेख संख्या वाढवू शकत होते. पण प्रत्येकाला येणारे अनुभव आणि त्यांनी आत्मसात केलेले ज्ञान या सर्वस्वी व्यक्ती सापेक्ष गोष्टी असल्याने तुम्ही तुमचा अनुभव घेऊन पहा.येथे येउन आपण इतर कोणावर नाही तर स्वतःवरच उपकार करत आहोत.
बाकी तुम्ही ठरवा तुमचे स्वतःवर प्रेम आहे कि..........
"आर्ट ऑफ लिव्हिंग"शी निगडीत सर्व लेख हे माझे अनुभव आहेत आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे.
तुम्हाला जर काही वेगळे अनुभव असतील तर ते जरूर सांगा. उगाच मोर्चा / दगड-शाई-चप्पल फेक असले प्रकार करू नये.
..........................
..........................
कॅलीडोस्कोप : ९ - Breathing LIFE...................
कॅलीडोस्कोप : ९
Breathing LIFE...................
८ फेब्रु चा दिवस थोडा वाईट सुरु झाला होता. मी स्वतः ४ वाजता उठून योगा आणि सुदर्शन क्रिया करून वेळेत तयार असताना फक्त इतरांच्या आळशी पणामुळे बरोबर एक तास उशिरा कार्यशाळेत सहभागी झालो होतो.
आधीच माझ डोक तापलेलं असताना वर आणखीन इतरांच्या नजरा आणि गुरुजींचे बोलणे ऐकून घेतल्यावर मला २ क्षणांसाठी वाटू लागले कि मी तडक तेथून निघून जावे.
परंतु, इथे परत माझा "म" देवदूत कामी आला. महाभारतात जसा युधिष्ठिराच्या पायाचा अंगठा हलल्या शिवाय भीमाला कोणतीहि कृती करण्याची परवानगी नव्हती, तोच युक्तिवाद मी माझा राग काबूमध्ये ठेवण्यासाठी वापरते.कधीही राग आला कि सगळ्यात आवडत्या व्यक्तीचा चेहरा नजरे समोर आणते त्यामुळे शांत राहायला बरीच मदत होते.
सगळा राग/चिडचिड बाजूला ठेऊन क्रिया करण्यात मी लक्ष गुंतवले.ध्यानमग्न असताना जो काही अनुभव आला त्यामुळे मी थोडीशी घाबरून गेले होते. माझ्यात एखादी शक्ती शिरून तिने माझा ताबा घेतलाय असे वाटू लागले.संपूर्ण शरीर खूप गरम आणि दगडाप्रमाणे अगदी निश्चल झाल्यासारखे जाणवत होते. ध्यानातून बाहेर पडल्यावर एवढे थकल्यासारखे वाटत होते कि पुढे काही करण्याची अथवा ऐकण्याची इच्छा उरली नव्हती.माझ्या नशिबाने गुरुजी माझी अवस्था समजून जास्त काही विचारात बसले नाहीत.
शेवटचा दिवस(९ फेब्रु) खूपच मस्त होता. गुरुजींनी आम्हाला २ गटात विभागून फुटसलाड बनवायला सांगितले होते.फुटसलाड बनवायचे म्हणून माझा उत्साह एवढा ओसंडून वाहत होता कि काही देवदूतांनी माझी टिंगल करायला सुरुवात केली.
"कशाला एवढा उत्साह हवाय असल्या छोट्या गोष्टीत?" वगैरे वगैरे.
परंतु मला माहित होते कि मी काय करतेय. इतर मदत करो अथवा न करोत माझच सलाड चांगले असणार याची पक्की खात्री होती.
सगळी तयारी करून दुसऱ्यादिवशी वेळेत पोहोचलो. (आमच्याकडे अपाचे / avenger नसल्याने १० मि उशीर चालतो, लगेच कावू नका गुरुजी )
फुटसलाड बनवायला सुरुवात करण्याआधी गुरुजींनी आणखीन एक गुगली टाकली कि 'सलाड बनविताना चाकू, सुऱ्या असले धार असणारी अवजारे वापरायची नाहीत.' बाकीच्या देवदूतांच्या डोक्यात काय चालू झाले माहित नाही, पण मी खुश होते. कारण माझ्या सलाड मांडणी मध्ये चाकू/सुरी नसल्याने फार काही फरक पडणार नव्हता.सगळे नीट सजवून झाल्यावर जे काही सलाड तयार झाले ते तुम्ही फोटोत पाहू शकता.(माझा उत्साह नक्कीच सार्थकी लागला होता.)
खाऊन झाल्यावर थोडी क्रिया आणि सत्संग करून आमची हि ६ दिवसांची कार्यशाळा पार पडली.सत्संग मधील भजन खूपच सुंदर आणि वेगळी होती.आतापर्यंत हिंदी गाण्यांपलीकडे कधी नाच केला नसल्याने भजन गाताना कसे नाचतात हे मला समजत नव्हते.जमेल तसे नाचून (?) मी ती वेळ मारून नेली (lolzzzzz. )
सर्वात शेवटी सगळ्यांना एक-एक कागद-पेन देण्यात आला.प्रत्येकाने तो कागद आपल्या पाठीवर धरून ठेवायचा आणि दुसऱ्या व्यक्तीने त्या कागदावर समोरील व्यक्तीबाबत चांगली गोष्ट लिहायची (फेसबुकची वॉल आमच्या पाठीवर होती.)
हे सर्व करताना जाणवले कि आपल्याला समोरच्या माणसाला नावे ठेवताना शब्द पटकन आठवतात, परंतु चांगले लिहायचे म्हणल्यावर बुद्धीला चालना द्यावी लागते.
.......................... ...........क्रमश: (3)
.......................... .......................... ..............अस्मित (१० मार्च २०१४)
Breathing LIFE...................
८ फेब्रु चा दिवस थोडा वाईट सुरु झाला होता. मी स्वतः ४ वाजता उठून योगा आणि सुदर्शन क्रिया करून वेळेत तयार असताना फक्त इतरांच्या आळशी पणामुळे बरोबर एक तास उशिरा कार्यशाळेत सहभागी झालो होतो.
आधीच माझ डोक तापलेलं असताना वर आणखीन इतरांच्या नजरा आणि गुरुजींचे बोलणे ऐकून घेतल्यावर मला २ क्षणांसाठी वाटू लागले कि मी तडक तेथून निघून जावे.
परंतु, इथे परत माझा "म" देवदूत कामी आला. महाभारतात जसा युधिष्ठिराच्या पायाचा अंगठा हलल्या शिवाय भीमाला कोणतीहि कृती करण्याची परवानगी नव्हती, तोच युक्तिवाद मी माझा राग काबूमध्ये ठेवण्यासाठी वापरते.कधीही राग आला कि सगळ्यात आवडत्या व्यक्तीचा चेहरा नजरे समोर आणते त्यामुळे शांत राहायला बरीच मदत होते.
सगळा राग/चिडचिड बाजूला ठेऊन क्रिया करण्यात मी लक्ष गुंतवले.ध्यानमग्न असताना जो काही अनुभव आला त्यामुळे मी थोडीशी घाबरून गेले होते. माझ्यात एखादी शक्ती शिरून तिने माझा ताबा घेतलाय असे वाटू लागले.संपूर्ण शरीर खूप गरम आणि दगडाप्रमाणे अगदी निश्चल झाल्यासारखे जाणवत होते. ध्यानातून बाहेर पडल्यावर एवढे थकल्यासारखे वाटत होते कि पुढे काही करण्याची अथवा ऐकण्याची इच्छा उरली नव्हती.माझ्या नशिबाने गुरुजी माझी अवस्था समजून जास्त काही विचारात बसले नाहीत.
शेवटचा दिवस(९ फेब्रु) खूपच मस्त होता. गुरुजींनी आम्हाला २ गटात विभागून फुटसलाड बनवायला सांगितले होते.फुटसलाड बनवायचे म्हणून माझा उत्साह एवढा ओसंडून वाहत होता कि काही देवदूतांनी माझी टिंगल करायला सुरुवात केली.
"कशाला एवढा उत्साह हवाय असल्या छोट्या गोष्टीत?" वगैरे वगैरे.
परंतु मला माहित होते कि मी काय करतेय. इतर मदत करो अथवा न करोत माझच सलाड चांगले असणार याची पक्की खात्री होती.
सगळी तयारी करून दुसऱ्यादिवशी वेळेत पोहोचलो. (आमच्याकडे अपाचे / avenger नसल्याने १० मि उशीर चालतो, लगेच कावू नका गुरुजी )
फुटसलाड बनवायला सुरुवात करण्याआधी गुरुजींनी आणखीन एक गुगली टाकली कि 'सलाड बनविताना चाकू, सुऱ्या असले धार असणारी अवजारे वापरायची नाहीत.' बाकीच्या देवदूतांच्या डोक्यात काय चालू झाले माहित नाही, पण मी खुश होते. कारण माझ्या सलाड मांडणी मध्ये चाकू/सुरी नसल्याने फार काही फरक पडणार नव्हता.सगळे नीट सजवून झाल्यावर जे काही सलाड तयार झाले ते तुम्ही फोटोत पाहू शकता.(माझा उत्साह नक्कीच सार्थकी लागला होता.)
खाऊन झाल्यावर थोडी क्रिया आणि सत्संग करून आमची हि ६ दिवसांची कार्यशाळा पार पडली.सत्संग मधील भजन खूपच सुंदर आणि वेगळी होती.आतापर्यंत हिंदी गाण्यांपलीकडे कधी नाच केला नसल्याने भजन गाताना कसे नाचतात हे मला समजत नव्हते.जमेल तसे नाचून (?) मी ती वेळ मारून नेली (lolzzzzz. )
सर्वात शेवटी सगळ्यांना एक-एक कागद-पेन देण्यात आला.प्रत्येकाने तो कागद आपल्या पाठीवर धरून ठेवायचा आणि दुसऱ्या व्यक्तीने त्या कागदावर समोरील व्यक्तीबाबत चांगली गोष्ट लिहायची (फेसबुकची वॉल आमच्या पाठीवर होती.)
हे सर्व करताना जाणवले कि आपल्याला समोरच्या माणसाला नावे ठेवताना शब्द पटकन आठवतात, परंतु चांगले लिहायचे म्हणल्यावर बुद्धीला चालना द्यावी लागते.
..........................
..........................
कॅलीडोस्कोप : ८ - Breathing LIFE...................
कॅलीडोस्कोप : ८
Breathing LIFE...................
प्रोत्साहन तर मिळाले पण पुढे काय….
शोध सुरु….
गुगल वर मिळेल ती माहिती शोधून काढली. दुर्दैवाने या आंतरजालावर अद्यावात माहिती उपलब्ध न झाल्याने आणि मी पाठवलेल्या पत्रांना कधीच उत्तर न आल्यामुळे थोडा वेळ वाया गेला.
अचानक, एक दिवस एका मित्राशी बोलत असताना माझा मार्ग मला सापडला.
माझ्या सुदैवाने (मित्राच्या दुर्दैवाने ) त्याच्या सोबत राहणारे त्याचे घर सोबती हि आर्ट ऑफ लिव्हिंगची ६ दिवसांची कार्यशाळा आमच्याच कार्यालयाच्या आवारात सुरु करणार होते.गंगा स्वतःच दारात आल्याने नुसते हातच नव्हे तर पूर्णपणे या अनुभवात स्वतःला झोकून दिले.
गेल्या महिन्यात (४ ते ९ फेब्रु. ) दरम्यान हि ६ दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली.इथे मला अजून बरेच देवदूत भेटले. त्यातील महत्वाचे ३ देवदूत म्हणजे देवदूत "य", "त" आणि "प".
आधी या देवदूतांची ओळख करून घेऊ थोडी:
१) "प" : हे आमचे गुरुजी आणि देवदूत पण. यांना भेटल्यावर चांगल्या गोष्टींची सुरुवात झाली याची खात्री पटली. त्यातून हे आमच्या गावचे (सोलापूर) म्हणल्यावर अजून काय हवे या गरीब पामराला? हे स्वतः गेली ६ वर्षे आर्ट ऑफ लिव्हिंगशी निगडीत आहेत (यांचे पूर्ण कुटुंब पण). आता गुरुजी म्हणून, लगेच त्यांना ५०-६० वर्षांचा म्हातारा(?) बनवू नका. एकदम "यंदा कर्तव्य आहे" या गटात बसणारे आहेत.कधीही कसलीही मदत करायला तयार आणि मनमिळावू. ६ दिवस पूर्ण कार्यशाळा संपन्न होई पर्यंत यांनी आमची राहण्याची/जेवणाची सोय "य" देवदूताकडे केली होती.
२) "य" : हा देवदूत आमची दीदी आहे.पूर्ण ६ दिवसात अगदी आपल्याच घरात असल्यासारखे आम्ही ३ लोक राहत होतो. काहीही मागा आणि काहीही करा कोणी अडवत नव्हते. सकाळच्या नाश्त्याला सुकामेवा पासून गरमागरम डोसा पर्यंत सगळ काही ओरपणे चालू होते.वर आणखी कार्यालयात जाताना पण दीदी आम्हाला गाडीने पोचवत होती. खरेतर १५ मिनटांचा चालत जाण्यायोगा रस्ता, पण आमच्या सोबतचे लोक वेळेवर तयार होत नसल्याने नेहमी उशीर होयचा आणि सरतेशेवटी
गाडीने यावे लागायचे.
३) "त" : हा देवदूत म्हणजे आमचा टेडीबियर. २४/७/३६५ दिवस हा फक्त हसत असावा असे वाटते.याने कार्यशाळेत बरीच मदत ("क्रिया" मॉडेलिंग )केली. तरी पण मला आवडलेली गोष्ट म्हणजे त्याच्या "अवेन्जर (Avenger)" वरून केलेली छोटी सफर. (:) it was fab )
साधारण संध्याकाळी ६-७ च्या दरम्यान आमची कार्यशाळा सुरु व्हायची.कामामुळे शरीर थकलेलं असल्याने सुरुवातीला उत्साह जरा कमीच होता.त्यात सोबतच्या लोकांचे योग कम माकडचाळे बघता मी आणि माझी मैत्रीण तिथे हास्यक्लब सुरु करायचो. कधीतरी आम्ही आमच्या या सतत हसण्याच्या सवयीमुळे मार खावा लागणार याची खात्री होती, परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही. (गुरुजींचा चांगुलपणा आणि संयम; दुसरे काय.... ) इथे शिकविला जाणारा योग किंवा दिले जाणारे उपयोगी ज्ञान या बद्दल आधीच बरीचशी पुस्तके वाचून कोळून प्यायलेलो असल्याने आम्हाला (मी आणि माझी मैत्रीण) "आपण का आलोय येथे?" असा प्रश्न पडलेला.या ज्ञान दानाच्या वेळेस विचारल्या गेलेल्या प्रश्नांना सगळ्यात जास्त बरोबर उत्तरे मी देत होते आणि जास्त चॉकलेट्स पण मीच मिळविली (टाळ्या ).
सुदर्शन क्रिया आणि प्राणायाम करायला सुरुवात केल्यानंतर खऱ्या आनंदाला सुरुवात झाली.क्रिया करून झाल्यावर जाणवले कि एवढा शांत आणि समाधानी अनुभव आपण फार कमीवेळा घेतलेला आहे. (या आधी रेकी करताना मला असे अनुभव आले होते पण ते थोडे कमी आहेत.)
स्वतःची "अशी ओळख" खूपच नवीन आणि आनंददायी होती.
परंतु १-२ दिवसात कामाच्या व्यापामुळे आणि पुरेशी झोप न झाल्याने माझा, या गोष्टीतील सहभाग थोडा कमी होऊ लागला (झोप पूर्ण न होण्याचे मुख्य कारण मैत्रिणी सोबत रात्रभर चालणाऱ्या गप्पा).कार्यशाळा चालू असताना तेथे असणाऱ्या ac मुळे माझा घसा जो खराब झाला तो पूर्ण बारा व्हायला २-३ आठवडे लागले आणि भरपूर वेगवेगळ्या औषधांचा मारा करावा लागला.तरीसुद्धा ठरवून क्रिया करत राहिले कारण "म" आणि "ज" ला केलेले प्रॉमिस तोडायचे नव्हते.
हे सगळे छान अनुभव घेत असताना खरी मजा आली ती ७ फेब्रु ला. इतके दिवस इतक्या चांगल्या गोष्टी शिकत असताना २ देवदूतांच्या छोट्याश्या चुकीमुळे ("प" आणि "अ" चे चुकीचे संयोजन वादाला कारणीभूत होते) जो काही मजेशीर किस्सा घडला ते आठवले कि अजूनही मी हसत राहते. जिथे अहंकार बाजूला ठेऊन परमात्म्याशी एकरूप होण्याच्या गोष्टी शिकल्या त्याच्या दुसऱ्याच क्षणाला हे असे काही घडेल याची अपेक्षा नव्हती केली. मी सोयीस्करपणे त्या वादातून काढता पाय घेतला होता. कारण एकच, जिथे मी आभार मानताना सुद्धा वाद टाळते (धन्यवाद ऐवजी नुसतेच "धन्यु" म्हणते) तेथे मी इतक्या शुल्लक गोष्टीत का लक्ष घालावे???
मी माझ्या परीने त्या प्रश्नाचा निकाल लावला होता.
..........................
..........................
कॅलीडोस्कोप : ७ - Breathing LIFE...................
कॅलीडोस्कोप : ७
Breathing LIFE...................
खरेतर हा लेख लिहिण्यासाठी मला थोडं मागे जावं लागेल.
थांबा थांबा!! मागे म्हणजे आहे त्या जागेवरून मागे, किंवा फुटबॉल आणि क्रिकेट खेळताना चेंडू मारण्या/फेकण्याआधी जो काही पवित्रा घेतला घेतला जातो तसे मागे नव्हे. तर सिनेमामध्ये Flashback दाखवतात तसा भूतकाळ आणि वर्तमानाचा खेळ.
३-४ वर्ष मागे......
हा लेख आहे माझ्या तामसी (?) आयुष्याचा अध्यात्माकडे वळण्याच्या संदर्भाचा.
लेख वाचून मला आस्तिक - नास्तिक, चांगली-वाईट असे ट्याग लावू नका.कारण या संकल्पनांशी मी वाद घालत बसत नाही. माझं आणि त्याचं जे काही, आणि जसे काही नाते आहे तेवढे माझ्यासाठी पुरेसं आहे.
तर, मी माझ्या आयुष्याला स्वतःच्या मर्जीनुसार जगायला सुरुवात केली तेव्हांपासूनचा हा प्रवास चढ-उतार,डोंगर - दऱ्या, काळ-गोर सर्वकाही असणारा.स्वतःच्या मर्जीनुसार आयुष्य अनुभवत, जे काही चांगले/ वाईट घडेल त्याची पूर्णपणे जबाबदारी घेत स्वतःला घडवत जाणे.काही पश्चातापाचे क्षण,पण त्याच सोबत मान ताठ ठेऊन जीवनाला सामोरी जाण्याची हिंमत असलेला.
इतर सामान्य माणसांप्रमाणे भौतिक सुखाचा आनंद घेत जगत (?)असताना स्वतःची खरी ओळख कधी गळून पडली हे समजायला बराच वेळ लागला. (भौतिक सुखाच्या प्रत्येकाच्या वेगळ्या व्याख्या असतात. प्रत्येकाने आपली तपासावी.)मित्र म्हणवणारे लोक मैत्री जाणणारे नव्हते,पैसा पायाला प्रकाशवेग लावून होता.एकंदर काय तर मनापासून सुखी, आनंदी नव्हते.कुठेही असले तरी फक्त एकच जाणवत राहायचे "काहीतरी कमी आहे". गर्दीतील एकटेपण बरेचदा आनंददायी असले
तरी कधीतरी ते सुद्धा रातकिड्या प्रमाणे लपून सतत कर्कश्श अस्तित्वाची जाणीव करून द्यायचे.
एकदिवस हे सगळे थांबवायचेच हे ठरवून नव्याने सुरुवात केली. नवीन नोकरी, नवीन जागा, नवे लोक आणि परत एकटीनेच स्वतःचा शोध घेऊ लागले.या नवीन रस्त्यावर पहिलीच व्यक्ती भेटली ती नक्कीच देवाने ठरवून माझ्यासाठी पाठवलेली होती.या व्यक्तीला आपण "देवदूत म" असे नाव देऊया, म्हणजे पुढे लेखभर संदर्भ व्यवस्थित लागतील. या "म "देवदूताने माझे आयुष्य अगदी ३६०
गुणिले कितीतरी अंश/कोनातून बदलून टाकले. परत पहिल्यासारखी माझ्यातील "मी" जिवंत झाले. कविता लिहिणे, गाणी ऐकणे आणि आयुष्य जगणे सुरु झाले. यात सर्वात महत्वाची एक गोष्ट झाली ती म्हणजे माझे त्या आदिम शक्तीशी असलेले भांडण कमी होऊ लागले. आणि सुरु झाला तो अध्यात्माचा एक सुंदर अनुभव.
ज्या गोष्टी आजवर टाळल्या त्याच गोष्टींनी खरा आनंद अनुभवायला मिळाला. यामध्ये रोज सकाळी पाठ वाचन,प्राणायाम, सुदर्शन क्रिया सर्वकाही मिसळून गेले.
एक मिनिट "हि सुदर्शन क्रिया कुठून आली मधेच???" …
अहो तीच तर खरी गम्मत आहे. इथे एंट्री झाली ती अजून एका "देवदूत ज" ची. या दोन्ही "म आणि ज" देवदूतांनी मिळून मला हि क्रिया शिकून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
तेथून एका द्वैताचा अद्वैताकडे बदल सुरु झाला.
..........................
..........................
कॅलीडोस्कोप : ६ - नाट्याची नाटकीयता
कॅलीडोस्कोप : ६
नाट्याची नाटकीयता
अलीकडे पुण्याच्या सामाजिक/व्यावसायिक रंगभूमीवर "योनी" या "विषयाशी" संबंधित नाटके येऊ लागली आहेत, त्यातीलच हे एक नाटक: "Vagina the shadow of a lady" अर्थात "त्या चार योनींची गोष्ट".
परंतु नाटकाचा विषय चांगला वाटला म्हणून सहपरिवार नाटक पाहायला गेलो आणि कंटाळून घरी आलो.नाटकाच्या कथे पासून ते नेपथ्य, संवाद, दिग्दर्शन अशा या ना त्या बाबतीत टाळता येण्यासारख्या चुका होत्या.
नाटक सुरु होण्याआधी, नाटकाविषयी माहिती देताना जी काही २-३ मिनिटांची बडबड केलीये ती इतकी "नाटकी" होती कि नाटक पाहायला आलोय कि वकृत्व स्पर्धा याचा पेच निर्माण व्हावा.(हीच बोलण्याची स्टाईल नाटकाच्या उत्तरार्धात "कामदेवी" नावाच्या पात्राच्या तोंडी आहे - कारण २ हि पात्रे एकाच व्यक्तीने रंगविली आहेत).
या नाटकाची कथा ५ मैत्रिणींच्या किटी पार्टी पासून सुरु होते.या मैत्रिणींचे वय साधारण १८ वर्षापासून पुढे असावे कारण, त्या मध्ये काही जणी १५ ते २० वर्षांचा लग्नाचा अनुभव असलेल्या, तर एक जण "कीस केल्याने मुले होतात का?" असा निरागस प्रश्न विचारणारी आहे.(वयात एवढे अंतर असूनसुद्धा ती "निरागस" मुलगी या बायकांसोबत किटी पार्टीत कशी काय? असे प्रश्न विचारायचे नाहीत).
अपेक्षेप्रमाणे या कथेत एका स्त्री लग्नाला २० वर्षे होऊन पण शारीरिक पातळीवर सुखी नाही, दुसरीवर लहानपणीच बलात्कार झालेला म्हणून पुरुषांचा द्वेष करणारी, तिसरी गावातून लग्न करून फसवून आणलेली आणि वेश्या झालेली आणि चौथी मोलकरीण अशी पात्रे आहेत. या पात्रांचा अंदाज आधीच आल्यामुळे नाटकात पुढे काय घडणार आणि काय संवाद असतील हे कोणालाही समजू शकेल. त्यातून हे नाटक सादर होत होते ते खुद्द पुण्यात आणि पुण्याच्या रसिकांबद्दल मी तुम्हाला वेगळे काय सांगणार…?
मूळ कथा, प्रकाशयोजना यामध्येच उणीवा असल्याने कलाकारांच्या स्टेजवरील चुकांकडे दुर्लक्ष करण्यापलीकडे काही करता येत नव्हते.स्टेजवर अडखळणे, विंगेत कोणाचातरी मोबाईल वाजून माईकवर खरखर आवाज येणे, sexologist पात्राने एकदाही प्रेक्षकांकडे पाहून संवाद न म्हणणे या अशा खूप साऱ्या चुका हे नाटक चालू असताना घडत होत्या.
नाटकातील मोलकरीण सिल्कची साडी घालून घरकाम करायला आलेली दाखविली आहे (साधी साडी असती तर ते पात्र मोलकरीण तरी वाटले असते).१५ दिवसांनी उगवल्या नंतरही आधी घरभर नाचून "तुमचे घर किती छान आणि मोठे आहे" हे मालकिणीला सांगत राहते. १५ दिवसात घर बदलले कि मोलकरीण काहीच कळत नाही.वर आणखीन काम न करता ती मोलकरीण मालकिणीच्या बेडरूम मधील वेगवेगळी चित्रे आणि मासिके यांच्या बद्दल बोलून स्वतःच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलून निघून जाते.जणू काही ती फक्त तेवढेच बोलण्यासाठी एवढे दिवसांनी उगविली होती. अशा या मोलकरणीला " तू पैसे साठवून, एक पूर्ण दिवस नवऱ्यासोबत बाहेर भटकून एखाद्या हॉटेल मध्ये जाऊन समागम करावेस " असा सुज्ञ सल्ला तिच्या मालकीणबाई देतात.
नाटकाच्या शेवटी कामदेवीला प्रार्थना करून स्टेजवर प्रकट केले आहे. हि देवी "स्त्री जेव्हां शरीरसुखाच्या अत्युच्य शिखरावर असते तेव्हां कसे आवाज काढते आणि पुरुषांनी आपली स्त्री संपूर्ण उद्दीपित झाली कि नाही हे कसे ओळखावे याचे ज्ञान ५ वेगवेगळे आवाज ऐकवून देते" (ध्वनीमुद्रित आवाज). खरेतर या आवाज ऐकविण्याचा लोकांना नाटकाकडे आकर्षित करण्याचा हेतू असावा.
हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यापेक्षा आधी जर का नाट्य स्पर्धांमधून दाखविले गेले असते तर दिग्दर्शकाला आपल्या नाटकात काय कमी आहे हे तरी समजले असते.
स्त्रियांना नेहमी रडक्याच का दाखवितात काही समजत नाही.
................अस्मित (4th Jan 2014)
नाट्याची नाटकीयता
अलीकडे पुण्याच्या सामाजिक/व्यावसायिक रंगभूमीवर "योनी" या "विषयाशी" संबंधित नाटके येऊ लागली आहेत, त्यातीलच हे एक नाटक: "Vagina the shadow of a lady" अर्थात "त्या चार योनींची गोष्ट".
परंतु नाटकाचा विषय चांगला वाटला म्हणून सहपरिवार नाटक पाहायला गेलो आणि कंटाळून घरी आलो.नाटकाच्या कथे पासून ते नेपथ्य, संवाद, दिग्दर्शन अशा या ना त्या बाबतीत टाळता येण्यासारख्या चुका होत्या.
नाटक सुरु होण्याआधी, नाटकाविषयी माहिती देताना जी काही २-३ मिनिटांची बडबड केलीये ती इतकी "नाटकी" होती कि नाटक पाहायला आलोय कि वकृत्व स्पर्धा याचा पेच निर्माण व्हावा.(हीच बोलण्याची स्टाईल नाटकाच्या उत्तरार्धात "कामदेवी" नावाच्या पात्राच्या तोंडी आहे - कारण २ हि पात्रे एकाच व्यक्तीने रंगविली आहेत).
या नाटकाची कथा ५ मैत्रिणींच्या किटी पार्टी पासून सुरु होते.या मैत्रिणींचे वय साधारण १८ वर्षापासून पुढे असावे कारण, त्या मध्ये काही जणी १५ ते २० वर्षांचा लग्नाचा अनुभव असलेल्या, तर एक जण "कीस केल्याने मुले होतात का?" असा निरागस प्रश्न विचारणारी आहे.(वयात एवढे अंतर असूनसुद्धा ती "निरागस" मुलगी या बायकांसोबत किटी पार्टीत कशी काय? असे प्रश्न विचारायचे नाहीत).
अपेक्षेप्रमाणे या कथेत एका स्त्री लग्नाला २० वर्षे होऊन पण शारीरिक पातळीवर सुखी नाही, दुसरीवर लहानपणीच बलात्कार झालेला म्हणून पुरुषांचा द्वेष करणारी, तिसरी गावातून लग्न करून फसवून आणलेली आणि वेश्या झालेली आणि चौथी मोलकरीण अशी पात्रे आहेत. या पात्रांचा अंदाज आधीच आल्यामुळे नाटकात पुढे काय घडणार आणि काय संवाद असतील हे कोणालाही समजू शकेल. त्यातून हे नाटक सादर होत होते ते खुद्द पुण्यात आणि पुण्याच्या रसिकांबद्दल मी तुम्हाला वेगळे काय सांगणार…?
मूळ कथा, प्रकाशयोजना यामध्येच उणीवा असल्याने कलाकारांच्या स्टेजवरील चुकांकडे दुर्लक्ष करण्यापलीकडे काही करता येत नव्हते.स्टेजवर अडखळणे, विंगेत कोणाचातरी मोबाईल वाजून माईकवर खरखर आवाज येणे, sexologist पात्राने एकदाही प्रेक्षकांकडे पाहून संवाद न म्हणणे या अशा खूप साऱ्या चुका हे नाटक चालू असताना घडत होत्या.
नाटकातील मोलकरीण सिल्कची साडी घालून घरकाम करायला आलेली दाखविली आहे (साधी साडी असती तर ते पात्र मोलकरीण तरी वाटले असते).१५ दिवसांनी उगवल्या नंतरही आधी घरभर नाचून "तुमचे घर किती छान आणि मोठे आहे" हे मालकिणीला सांगत राहते. १५ दिवसात घर बदलले कि मोलकरीण काहीच कळत नाही.वर आणखीन काम न करता ती मोलकरीण मालकिणीच्या बेडरूम मधील वेगवेगळी चित्रे आणि मासिके यांच्या बद्दल बोलून स्वतःच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलून निघून जाते.जणू काही ती फक्त तेवढेच बोलण्यासाठी एवढे दिवसांनी उगविली होती. अशा या मोलकरणीला " तू पैसे साठवून, एक पूर्ण दिवस नवऱ्यासोबत बाहेर भटकून एखाद्या हॉटेल मध्ये जाऊन समागम करावेस " असा सुज्ञ सल्ला तिच्या मालकीणबाई देतात.
नाटकाच्या शेवटी कामदेवीला प्रार्थना करून स्टेजवर प्रकट केले आहे. हि देवी "स्त्री जेव्हां शरीरसुखाच्या अत्युच्य शिखरावर असते तेव्हां कसे आवाज काढते आणि पुरुषांनी आपली स्त्री संपूर्ण उद्दीपित झाली कि नाही हे कसे ओळखावे याचे ज्ञान ५ वेगवेगळे आवाज ऐकवून देते" (ध्वनीमुद्रित आवाज). खरेतर या आवाज ऐकविण्याचा लोकांना नाटकाकडे आकर्षित करण्याचा हेतू असावा.
हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यापेक्षा आधी जर का नाट्य स्पर्धांमधून दाखविले गेले असते तर दिग्दर्शकाला आपल्या नाटकात काय कमी आहे हे तरी समजले असते.
स्त्रियांना नेहमी रडक्याच का दाखवितात काही समजत नाही.
................अस्मित (4th Jan 2014)
"कॅलिडोस्कोप"............५ " - Mr.& Mrs. Nosy
"कॅलिडोस्कोप"............५ "
Mr.& Mrs. Nosy
लिखाणाचा विषय तसा गंभीर आहे. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. कारण आपल्याकडे याचे गांभीर्य फार कमी लोकांना जाणवते.
गेले काही वर्ष आणि विशेषत:या वर्षातील सगळे दिवस, अशी एकतरी व्यक्ती मला भेटते जिला माझ्या लग्नाची अत्यंत काळजी लागलेली असते (ha hah ha).
(त्यात निम्म्याहून जास्त पुरुष मंडळी आहेत.) तर अशा तमाम काळजीवाहू मंडळीना (स्त्री/ पुरुष दोन्ही) माझे काही प्रश्न आहेत :
१. लग्न म्हणजे नेमके काय? तुमचे लग्नाविषयी प्रामाणिक विचार.
२. तुमच्या आयुष्यात तुम्ही खरच फक्त तुमच्याच साथीदारावर प्रेम केलंय आणि खऱ्या अर्थाने वैवाहिक आयुष्य सुखी केलंय?
३. तुमच्यातील कितीजण एकटे विवाहित आहात? (हा प्रश्न बहुदा स्त्रियांना लागू पडतो.) इ. अजून बरेच प्रश्न आहेत, पण सध्या या प्रश्नांची उत्तरे स्वतःला तरी प्रामाणिकपणे देऊन पहा जमलीतर.
हे काळजीवाहू लोक पाहिले (B-) ), कि मनात विचार येतो, कि हे लोक स्वतः संसारात सुखी नाहीत, काहींचे घटस्फोट झालेले आहेत तर काही स्वतः अविवाहित आहेत.तरीसुद्धा यांना दुसऱ्यांच्या लग्नाची एवढी का बरे काळजी???
यांना नक्की त्रास कशाचा होत असतो?
मी माझे आयुष्य, माझ्या मनानुसार, पटेल त्या गोष्टी करून आनंदाने जगते याचा यांना इतका का त्रास व्हावा? (:O) कि मी एखाद्या पुरुषावर अवलंबून नाही म्हणून दु:ख यांना होते?
माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया बरेचदा मला "तू लग्न न करून किती सुखी आहे" यावर प्रवचन देतात आणि हेवा हि करतात. फावल्या वेळात स्वतःच्या (आणि कधी कधी दुसऱ्यांच्या) नवरे मंडळी आणि सासरच्यांना मनसोक्त शिव्या घालतात.
अशावेळी मी फक्त हसत असते, या लोकांवर नाही तर, ज्यांना स्वतःला अजून लग्न म्हणजे काय हे समजलेले नाही असे लोक दुसऱ्याच्या लग्नाविषयी किती आपुलकीने (??)आणि अधिकारवाणीने बोलतात. ज्यांना "कायद्याने परवानगी मिळते आणि कायमचे हक्काचे माणूस" फक्त यासाठीच लग्न करायचे असते त्यांना संसार म्हणजे नक्की काय हे कसे कळावे?
मी आजवर ज्या काही लग्नाळू लोकांना भेटले त्यातील बऱ्याच मुलांना लग्नाविषयी स्वतःचे काही विचार नव्हते. फक्त समाज आणि आई-वडील यांच्यासाठी लग्नाच्या बाजारात उभी असलेली हि फक्त बुजगावणी होती.अशा लोकांनी लग्न न करणे म्हणजेच समाजावर खरे उपकार होणार नाहीत का?
यांच्या कुटुंबाला आयटी क्षेत्रात काम करणारी मुलगी, गलेलठ्ठ पगार असणारी,सुंदर सुस्वरूप हवी असते. त्यात अजून तिने घरी भाकरी बनविणे, रांगोळी काढणे, आल्यागेल्याचे सगळे करणे हे पण आलेच. या तमाम लोकांना माझी विनंती आहे कि, घरून निघताना आधी स्वत:चे अमिबा सारखे वेडेवाकडे वाढलेले शरीर पाहत जा. जेवढ्या काही अपेक्षा आहेत त्यातील किती गोष्टी तुम्हाला स्वतःला करता येतात किंवा तुमच्याकडे त्या आहेत? तुम्ही किती पैसे कमावता? तुम्ही तुमच्या सासू- सासरे आणि नातेवाईकांची किती काळजी घेतली आहे? मुले दारू सिगरेट पिणारी असताना सुना कशाला सोज्वळ हव्यात? या सर्व गोष्टी तपासून घ्या.
त्यामुळे लोकांचा वेळ,पैसा, श्रम सगळे काही वाचेल.आणि तुम्ही निघून गेल्यावर मुली तुमचा जो उद्धार करतात तो थांबेल.
व. पु च्या वाक्याप्रमाणे "खरा संसार फक्त एका दिवसाचा आणि एका रात्रीचा असतो बाकी उरते ती फक्त त्याची पुनरावृत्ती". दुसऱ्यांच्या लग्नाची काळजी करण्यापेक्षा स्वतःचे संसार सुखी करण्याचा प्रयत्न करा, निदान उरलेली वर्षे तरी सुखात जातील.तुमच्या मुलाबाळांवर चांगले संस्कार तरी होतील.यासाठी मंगला सामंत यांचे "विवाह : भ्रमातून भानावर " हे पुस्तक नक्की वाचा.
लग्न आणि विवाह संस्था या विषयीचे समाजाचे विचार कधीतरी सुधारतील अशी अपेक्षा करते.
…………………. अस्मित. (11-11-13)
Mr.& Mrs. Nosy
लिखाणाचा विषय तसा गंभीर आहे. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. कारण आपल्याकडे याचे गांभीर्य फार कमी लोकांना जाणवते.
गेले काही वर्ष आणि विशेषत:या वर्षातील सगळे दिवस, अशी एकतरी व्यक्ती मला भेटते जिला माझ्या लग्नाची अत्यंत काळजी लागलेली असते (ha hah ha).
(त्यात निम्म्याहून जास्त पुरुष मंडळी आहेत.) तर अशा तमाम काळजीवाहू मंडळीना (स्त्री/ पुरुष दोन्ही) माझे काही प्रश्न आहेत :
१. लग्न म्हणजे नेमके काय? तुमचे लग्नाविषयी प्रामाणिक विचार.
२. तुमच्या आयुष्यात तुम्ही खरच फक्त तुमच्याच साथीदारावर प्रेम केलंय आणि खऱ्या अर्थाने वैवाहिक आयुष्य सुखी केलंय?
३. तुमच्यातील कितीजण एकटे विवाहित आहात? (हा प्रश्न बहुदा स्त्रियांना लागू पडतो.) इ. अजून बरेच प्रश्न आहेत, पण सध्या या प्रश्नांची उत्तरे स्वतःला तरी प्रामाणिकपणे देऊन पहा जमलीतर.
हे काळजीवाहू लोक पाहिले (B-) ), कि मनात विचार येतो, कि हे लोक स्वतः संसारात सुखी नाहीत, काहींचे घटस्फोट झालेले आहेत तर काही स्वतः अविवाहित आहेत.तरीसुद्धा यांना दुसऱ्यांच्या लग्नाची एवढी का बरे काळजी???
यांना नक्की त्रास कशाचा होत असतो?
मी माझे आयुष्य, माझ्या मनानुसार, पटेल त्या गोष्टी करून आनंदाने जगते याचा यांना इतका का त्रास व्हावा? (:O) कि मी एखाद्या पुरुषावर अवलंबून नाही म्हणून दु:ख यांना होते?
माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया बरेचदा मला "तू लग्न न करून किती सुखी आहे" यावर प्रवचन देतात आणि हेवा हि करतात. फावल्या वेळात स्वतःच्या (आणि कधी कधी दुसऱ्यांच्या) नवरे मंडळी आणि सासरच्यांना मनसोक्त शिव्या घालतात.
अशावेळी मी फक्त हसत असते, या लोकांवर नाही तर, ज्यांना स्वतःला अजून लग्न म्हणजे काय हे समजलेले नाही असे लोक दुसऱ्याच्या लग्नाविषयी किती आपुलकीने (??)आणि अधिकारवाणीने बोलतात. ज्यांना "कायद्याने परवानगी मिळते आणि कायमचे हक्काचे माणूस" फक्त यासाठीच लग्न करायचे असते त्यांना संसार म्हणजे नक्की काय हे कसे कळावे?
मी आजवर ज्या काही लग्नाळू लोकांना भेटले त्यातील बऱ्याच मुलांना लग्नाविषयी स्वतःचे काही विचार नव्हते. फक्त समाज आणि आई-वडील यांच्यासाठी लग्नाच्या बाजारात उभी असलेली हि फक्त बुजगावणी होती.अशा लोकांनी लग्न न करणे म्हणजेच समाजावर खरे उपकार होणार नाहीत का?
यांच्या कुटुंबाला आयटी क्षेत्रात काम करणारी मुलगी, गलेलठ्ठ पगार असणारी,सुंदर सुस्वरूप हवी असते. त्यात अजून तिने घरी भाकरी बनविणे, रांगोळी काढणे, आल्यागेल्याचे सगळे करणे हे पण आलेच. या तमाम लोकांना माझी विनंती आहे कि, घरून निघताना आधी स्वत:चे अमिबा सारखे वेडेवाकडे वाढलेले शरीर पाहत जा. जेवढ्या काही अपेक्षा आहेत त्यातील किती गोष्टी तुम्हाला स्वतःला करता येतात किंवा तुमच्याकडे त्या आहेत? तुम्ही किती पैसे कमावता? तुम्ही तुमच्या सासू- सासरे आणि नातेवाईकांची किती काळजी घेतली आहे? मुले दारू सिगरेट पिणारी असताना सुना कशाला सोज्वळ हव्यात? या सर्व गोष्टी तपासून घ्या.
त्यामुळे लोकांचा वेळ,पैसा, श्रम सगळे काही वाचेल.आणि तुम्ही निघून गेल्यावर मुली तुमचा जो उद्धार करतात तो थांबेल.
व. पु च्या वाक्याप्रमाणे "खरा संसार फक्त एका दिवसाचा आणि एका रात्रीचा असतो बाकी उरते ती फक्त त्याची पुनरावृत्ती". दुसऱ्यांच्या लग्नाची काळजी करण्यापेक्षा स्वतःचे संसार सुखी करण्याचा प्रयत्न करा, निदान उरलेली वर्षे तरी सुखात जातील.तुमच्या मुलाबाळांवर चांगले संस्कार तरी होतील.यासाठी मंगला सामंत यांचे "विवाह : भ्रमातून भानावर " हे पुस्तक नक्की वाचा.
लग्न आणि विवाह संस्था या विषयीचे समाजाचे विचार कधीतरी सुधारतील अशी अपेक्षा करते.
…………………. अस्मित. (11-11-13)
रविवार, १० नोव्हेंबर, २०१३
"कॅलिडोस्कोप"............४ "A Walk to Remember"
"कॅलिडोस्कोप"............४
"A Walk to Remember"
नवीन घरी रहायला आल्यापासून अपेक्षेप्रमाणे चांगल्या गोष्टी घडू लागल्या होत्या.त्यापैकी एक चांगली गोष्ट म्हणजे २ वर्षांच्या विश्रांती (?) नंतर परत सुरु केलेला व्यायाम.परंतु रविवार पर्यंत हे व्यायाम वेड असा काही ठेवणीतला अनुभव देईन असे कधी मनात देखील आले नव्हते.
झाले असे कि, गेले २ दिवस (म्हणजे सकाळचे ५ / ६ वाजता )एका मित्रा सोबत समुद्र किनारी चालायला जात होते.
भल्या पहाटेचा समुद्र आणि वाळूवरचे चालणे यासारखा सुखद अनुभव आणि त्याचे फायदे तुम्ही अनुभवायलाच हवेत.(खरेतर, इथे बरेच अलंकारिक शब्द वापरून माझ्या लेखाची उंची आणि लांबी वाढवू शकत होते, परंतु प्रत्येक वेळेस भावना आणि शब्दांची फोडणी दिलीच पाहिजे असे मला तरी वाटत नाही.)
तर, रविवारी साधारण १.५ - २ कि.मी. चालणे झाल्यानंतर जवळच असणारे जगन्नाथ मंदिर पाहण्याचे ठरविले. थोडावेळ किनाऱ्यावरून चालून झाल्यावर, रस्ता भटकू नये म्हणून आम्ही मुख्य रस्त्यावरून चालायला सुरुवात केली.रस्त्यावरून अनवाणी पायाने चालताना सुरुवातीला काही त्रास जाणविला नाही.गप्पा मारत मारत आमची पदयात्रा सुरु होती.गप्पांचे विषयही अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर असे असल्याने पायाला टोचणारी खडी साक्षात त्याचाच अनुभव देत होती.
काही कि.मी. अंतर चालून गेल्यावर जेव्हां पावलांचा तोल जातोय असे वाटू लागले तेव्हां मात्र देऊळ कुठेय आणि केव्हां येईल याचा ध्यास लागला.थोडे पुढे, आणखी थोडे पुढे, जवळच आलोय अशी समजूत घालत चालत राहिलो. काही वेळाने जेव्हां लक्षात आले कि परत तेवढेच अंतर चालून परत जायचे आहे तेव्हां मात्र अवसान गळाले. (आम्ही कारला विश्रांती देऊन एवढे लांब आलो होतो.) तोपर्यंत आम्ही साधारण ८-९ कि.मी. अंतर चालून झाले होते.परत एवढे अंतर कापून माघारी जाणे शक्य नसल्याने रिक्षा करून परत जाऊ असे मनात येत असतानाच आठविले कि उत्साहाच्या भरात आम्ही पैशाची पाकिटे गाडीतच ठेवली होती. आमच्याकडे पाहून कोणी बस भाड्या पुरते पण पैसे दिले नसते. स्वतःवरच हसत आम्ही देवळाच्या दिशेने चालत राहिलो आणि एकदाचे देवळात पोहोचलो.
देवळाचा परिसर आणि एकंदर बांधकाम पाहून चालत आल्याचे सार्थक झाल्याचे जाणविले.हे देऊळ कोळीवाड्याच्या परिसरात असून येथे माशांचा अजिबातवास येत नव्हता हे विशेष.देवळाचा परिसर अत्यंत स्वच्छ होता.
देवळात मुख्य जगन्नाथ,सुभद्रा आणि बलराम यांच्या मूर्तींखेरीज योगनरसिन्ह, शंकर, गजलक्ष्मि आणि विमला देवी, नवग्रह यांच्या मूर्ती आहेत. या देवळाची बांधणी ओरिया पद्धतीने कांचीपुरम वरून आणलेल्या काळ्या कणाश्म (ग्रॅनाइट) आणि राजस्थान मधील सफेद संगमरवर वापरून करण्यात आलेली आहे.देवळाच्या सभोवताली १ एकर जागेत खूप सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे आणि त्या बगीच्यातील फुले पूजेसाठी वापरली जातात. पुजारी सुद्धा ओरिसामधून आलेले आहेत. पूजा-अर्चा आणि मंत्र पठण सगळे काही ओरिया भाषेत चालते. हे देऊळ साधारण ७ वर्षांपूर्वी बांधलेले आहे. देवळातील मुख्य मूर्ती ओरिसातील जगन्नाथ मंदिराप्रमाणेच कडूनिंबाच्या लाकडापासून बनविलेल्या आहेत. ज्यादिवशी जगन्नाथपुरीची रथ यात्रा असते त्याच दिवशी येथे पण रथ यात्रा काढली जाते. हा रथ स्टिल, लाकूड आणि कापड वापरून बनविण्यात आलेला आहे. मंदिराचे विश्वस्थ प्रा.स.न.माझि (Prof. S.N. Majhi) यांच्या सांगण्यानुसार हा जगातील एकमेव स्टीलचा रथ आहे.देवळाच्या भिंतींवर आणि छतावर ओरिसाच्या पारंपारिक चित्रकारी नुसार (pata painting) पौराणिक कथांमधील दृश्य रंगविण्यात आलेली आहेत.
दर्शन झाल्यानंतर आम्ही देवळाच्या आवारात थोडावेळ बसलो (तो पर्यंत आम्ही एकही ठिकाणी थांबलो नव्हतो). परत कसे जायचे या बद्दल विचार करत असताना माझ्या मित्राच्या सल्ल्यानुसार मी देवळातच थांबावे आणि ते लिफ्टची सोय करून, परत जाऊन गाडी घेऊन येतील असे ठरले.सुदैवाने त्यांना लिफ्ट मिळाली आणि पाऊण तासात मला घ्यायला ते परत देवळात आले.
अशा प्रकारे सकाळी ५:३० ला सुरु केलेला व्यायाम ११ वाजता संपला आणि आमच्या या चालण्याच्या वेडाने आम्हाला एक अविस्मरणीय अनुभव दिला.
.......................... .......................... .......................... ......अस्मित
(२४ ऑक्टो २०१३)
(फोटो आणि देवळाची माहिती : गुगल आणि माझे मित्र यांच्या कडून साभार)
"A Walk to Remember"
नवीन घरी रहायला आल्यापासून अपेक्षेप्रमाणे चांगल्या गोष्टी घडू लागल्या होत्या.त्यापैकी एक चांगली गोष्ट म्हणजे २ वर्षांच्या विश्रांती (?) नंतर परत सुरु केलेला व्यायाम.परंतु रविवार पर्यंत हे व्यायाम वेड असा काही ठेवणीतला अनुभव देईन असे कधी मनात देखील आले नव्हते.
झाले असे कि, गेले २ दिवस (म्हणजे सकाळचे ५ / ६ वाजता )एका मित्रा सोबत समुद्र किनारी चालायला जात होते.
भल्या पहाटेचा समुद्र आणि वाळूवरचे चालणे यासारखा सुखद अनुभव आणि त्याचे फायदे तुम्ही अनुभवायलाच हवेत.(खरेतर, इथे बरेच अलंकारिक शब्द वापरून माझ्या लेखाची उंची आणि लांबी वाढवू शकत होते, परंतु प्रत्येक वेळेस भावना आणि शब्दांची फोडणी दिलीच पाहिजे असे मला तरी वाटत नाही.)
तर, रविवारी साधारण १.५ - २ कि.मी. चालणे झाल्यानंतर जवळच असणारे जगन्नाथ मंदिर पाहण्याचे ठरविले. थोडावेळ किनाऱ्यावरून चालून झाल्यावर, रस्ता भटकू नये म्हणून आम्ही मुख्य रस्त्यावरून चालायला सुरुवात केली.रस्त्यावरून अनवाणी पायाने चालताना सुरुवातीला काही त्रास जाणविला नाही.गप्पा मारत मारत आमची पदयात्रा सुरु होती.गप्पांचे विषयही अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर असे असल्याने पायाला टोचणारी खडी साक्षात त्याचाच अनुभव देत होती.
काही कि.मी. अंतर चालून गेल्यावर जेव्हां पावलांचा तोल जातोय असे वाटू लागले तेव्हां मात्र देऊळ कुठेय आणि केव्हां येईल याचा ध्यास लागला.थोडे पुढे, आणखी थोडे पुढे, जवळच आलोय अशी समजूत घालत चालत राहिलो. काही वेळाने जेव्हां लक्षात आले कि परत तेवढेच अंतर चालून परत जायचे आहे तेव्हां मात्र अवसान गळाले. (आम्ही कारला विश्रांती देऊन एवढे लांब आलो होतो.) तोपर्यंत आम्ही साधारण ८-९ कि.मी. अंतर चालून झाले होते.परत एवढे अंतर कापून माघारी जाणे शक्य नसल्याने रिक्षा करून परत जाऊ असे मनात येत असतानाच आठविले कि उत्साहाच्या भरात आम्ही पैशाची पाकिटे गाडीतच ठेवली होती. आमच्याकडे पाहून कोणी बस भाड्या पुरते पण पैसे दिले नसते. स्वतःवरच हसत आम्ही देवळाच्या दिशेने चालत राहिलो आणि एकदाचे देवळात पोहोचलो.
देवळाचा परिसर आणि एकंदर बांधकाम पाहून चालत आल्याचे सार्थक झाल्याचे जाणविले.हे देऊळ कोळीवाड्याच्या परिसरात असून येथे माशांचा अजिबातवास येत नव्हता हे विशेष.देवळाचा परिसर अत्यंत स्वच्छ होता.
देवळात मुख्य जगन्नाथ,सुभद्रा आणि बलराम यांच्या मूर्तींखेरीज योगनरसिन्ह, शंकर, गजलक्ष्मि आणि विमला देवी, नवग्रह यांच्या मूर्ती आहेत. या देवळाची बांधणी ओरिया पद्धतीने कांचीपुरम वरून आणलेल्या काळ्या कणाश्म (ग्रॅनाइट) आणि राजस्थान मधील सफेद संगमरवर वापरून करण्यात आलेली आहे.देवळाच्या सभोवताली १ एकर जागेत खूप सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे आणि त्या बगीच्यातील फुले पूजेसाठी वापरली जातात. पुजारी सुद्धा ओरिसामधून आलेले आहेत. पूजा-अर्चा आणि मंत्र पठण सगळे काही ओरिया भाषेत चालते. हे देऊळ साधारण ७ वर्षांपूर्वी बांधलेले आहे. देवळातील मुख्य मूर्ती ओरिसातील जगन्नाथ मंदिराप्रमाणेच कडूनिंबाच्या लाकडापासून बनविलेल्या आहेत. ज्यादिवशी जगन्नाथपुरीची रथ यात्रा असते त्याच दिवशी येथे पण रथ यात्रा काढली जाते. हा रथ स्टिल, लाकूड आणि कापड वापरून बनविण्यात आलेला आहे. मंदिराचे विश्वस्थ प्रा.स.न.माझि (Prof. S.N. Majhi) यांच्या सांगण्यानुसार हा जगातील एकमेव स्टीलचा रथ आहे.देवळाच्या भिंतींवर आणि छतावर ओरिसाच्या पारंपारिक चित्रकारी नुसार (pata painting) पौराणिक कथांमधील दृश्य रंगविण्यात आलेली आहेत.
दर्शन झाल्यानंतर आम्ही देवळाच्या आवारात थोडावेळ बसलो (तो पर्यंत आम्ही एकही ठिकाणी थांबलो नव्हतो). परत कसे जायचे या बद्दल विचार करत असताना माझ्या मित्राच्या सल्ल्यानुसार मी देवळातच थांबावे आणि ते लिफ्टची सोय करून, परत जाऊन गाडी घेऊन येतील असे ठरले.सुदैवाने त्यांना लिफ्ट मिळाली आणि पाऊण तासात मला घ्यायला ते परत देवळात आले.
अशा प्रकारे सकाळी ५:३० ला सुरु केलेला व्यायाम ११ वाजता संपला आणि आमच्या या चालण्याच्या वेडाने आम्हाला एक अविस्मरणीय अनुभव दिला.
..........................
(२४ ऑक्टो २०१३)
(फोटो आणि देवळाची माहिती : गुगल आणि माझे मित्र यांच्या कडून साभार)
कॅलिडोस्कोप - ३ माझी कांचीपुरम भेट : भक्तीचा शोध...............
कॅलिडोस्कोप - ३
माझी कांचीपुरम भेट : भक्तीचा शोध...............
या वेळेस ऑगस्ट महिन्याची कृपा झाली आणि शुक्रवार ते रविवार जोडून सुट्टी मिळाली.कामाच्या व्यापातून वेळ काढत एकटीनेच कांचीपुरमला जाण्याचे ठरविले.
तांबरम जंक्शन पासून सोयीस्कर बस सेवा उपलब्ध असल्याने एकटीने फिरणे सोपे गेले.
सकाळी ७ ला निघाले आणि दोन बस बदलत साधारण ९ ला कांचीपुरम ला पोहोचले. सर्वात आधी पोटपूजा केल्यावर मग देवदर्शन यात्रा सुरु झाली.
हे शहर चेन्नई पासून साधारण ७२ किमी अंतरावर वेगवती नदीच्या काठी वसलेले आहे.कांचीपुरम शहर हे भारतातील ७ मोक्ष मिळवण्याच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे.येथे पल्लव आणि चोला यांची राज्ये होऊन गेली. " कां " म्हणजे ब्रम्हा आणि "अंची " म्हणजे ब्रम्हाने केलेली विष्णूची पूजा असे मिळून या शहराचे नाव कांचीपुरम झाले. विष्णूच्या १०८ पवित्र मंदिरांपैकी १४ मंदिरे कांचीपुरम मध्ये आहेत, त्यातील मी फक्त एकच मंदिर पूर्णपणे पाहू शकले ते म्हणजे वरधराज पेरूमल मंदिर.
वरधराज पेरूमल मंदिर "पेरूमल कोइल" या नावाने ओळखले जाते. "कोइल" म्हणजे देऊळ आणि "मलय" (पेरू'मल') म्हणजे "टेकडी".
बस मधून जातानाच हे मंदिर आपल्या नजरेस पडते. मंदिरा भोवतालची भली मोठी भिंत आणि कळस दुरूनच आपल्याला दिसतो.आजूबाजूला खूप सारे पोपट शाळा भरल्याप्रमाणे विजेच्या तारांवर एका रांगेत बसून असलेले दिसतात.
हे मंदिर २३ एकर मध्ये वसलेले आहे.या मंदिरातील मांडणी विश्वकर्मा स्थापत्यकलेवर आधारित आहे. तेथील मूर्तींची कलाकुसर अजूनही उत्तम स्थितीत आहे. या मंदिराचे ३ उप-प्रकार आहेत : अझवार, मडाई पल्ली आणि थिरु मलई. मंदिरात ३२ देवळे, १९ ध्वजस्तंभ आणि ३८९ खांब असलेला सभामंडप (सिंहाची मूर्ती असलेला / याली प्रकारातील मूर्ती) आणि तलाव आहेत.येथील वैशिष्ट्य म्हणजे एकाच दगडातून कोरलेली भली मोठी दगडी साखळी. मंदिरातील मुख्य मूर्तीशिवाय येथे वरधराज स्वामींची लाकडामध्ये कोरलेली मूर्ती एका चांदीच्या खोक्यात ठेवलेली आहे. त्यामधून दर ४० वर्षांनी पाणी काढून टाकण्यात येते. (मला या पाण्याचा काही संदर्भ लागला नाही.) नरसिंहाच्या मूर्तीवर एक मुखवटा आहे. तो मुखवटा रहस्यमय असल्याचे मानण्यात येते. त्या मुखवट्यामध्ये गूढ शक्ती वास करते असा येथील लोकांचा समज आहे.
भगवान विष्णू सगळ्यांच्या मनोकामना ऐकून घेतात आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून विष्णूला "वरदार" (देणारा) असे नाव देण्यात आले आहे.
देवळामध्ये खूप मोठ्या छत्र्या आहेत,एका वेळेस एका माणसाला त्या उचलणे अवघड जाते. गाभाऱ्यात प्रवेश करण्याचे मार्ग एवढे चिंचोळे आहेत कि एखादा जाड माणूस अडकला तर एकंदर परिस्थिती अवघड होऊन बसेल.
या देवळातील व्यवस्थापन मात्र खूप खराब आहे. देवळात जाताना घेतलेला नारळ आणि फुले देवळातून बाहेर पडले तरी नक्की कुठे द्यायचे याचा अजिबात मागमूस लागला नाही. शेवटी तसेच घरी घेऊन यावे लागले.
मंदिरातील एकंदर वातावरण मला तरी फार काही भावले नाही. दर्शनासाठी रांगेत उभे असताना माझ्या समोरील एक जोडपे जे काही करत होते त्यावरून क्षणभर आपण नक्की देवळात उभे आहोत कि सारसबाग मध्ये असा विचार मनात येउन गेला.
देवळात सुद्धा ज्यांना वासना दूर ठेवता येत नाहीत अशांना देव कधी कळला असेल का???
देवळात एके ठिकाणी सोने आणि चांदीची पाल भिंतीवर लावलेली आहे.इंद्राने माता लक्ष्मीच्या शापातून मुक्त झाल्यावर या पाली वाहिल्या असे मानले जाते.
२ रु. चे तिकीट काढून शिडीवर चढून त्या पालींना हात लावला कि तुमची पापे धुवून निघतात. संपूर्ण चेन्नई मधेच एवढ्या पाली आहेत, विशेषत: माझ्या घरात त्यांचा असा काही मुक्त वावर आहे कि मला नक्की खात्री आहे कि मी आणि माझ्या पुढच्या असंख्य पिढ्या पापमुक्त झाल्यात.
देवळाच्या आवारात एकेठिकाणी प्रसाद विकत मिळतो. १०० रु. मध्ये गोड, तिखट आणि दही अशा ३ प्रकारचे भात, पापड, मोठी चकली, लाडू, अनारसा असा भरपूर प्रसाद दिला जातो, कि वेगळे जेवण जेवण्याची गरज उरत नाही.
या वेळेस हे एकच देऊळ पाहून झाले. पुढच्या भेटीत इतर देवळांना भेटी देऊन देवाला भक्तांचे दर्शन होते का ते पाहूया.
.......................... ....अस्मित
चूकभूल द्यावीघ्यावी.
(source of information friends and of course Mr.Google )
All rights are reserved by Sujata Pohekar.
माझी कांचीपुरम भेट : भक्तीचा शोध...............
या वेळेस ऑगस्ट महिन्याची कृपा झाली आणि शुक्रवार ते रविवार जोडून सुट्टी मिळाली.कामाच्या व्यापातून वेळ काढत एकटीनेच कांचीपुरमला जाण्याचे ठरविले.
तांबरम जंक्शन पासून सोयीस्कर बस सेवा उपलब्ध असल्याने एकटीने फिरणे सोपे गेले.
सकाळी ७ ला निघाले आणि दोन बस बदलत साधारण ९ ला कांचीपुरम ला पोहोचले. सर्वात आधी पोटपूजा केल्यावर मग देवदर्शन यात्रा सुरु झाली.
हे शहर चेन्नई पासून साधारण ७२ किमी अंतरावर वेगवती नदीच्या काठी वसलेले आहे.कांचीपुरम शहर हे भारतातील ७ मोक्ष मिळवण्याच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे.येथे पल्लव आणि चोला यांची राज्ये होऊन गेली. " कां " म्हणजे ब्रम्हा आणि "अंची " म्हणजे ब्रम्हाने केलेली विष्णूची पूजा असे मिळून या शहराचे नाव कांचीपुरम झाले. विष्णूच्या १०८ पवित्र मंदिरांपैकी १४ मंदिरे कांचीपुरम मध्ये आहेत, त्यातील मी फक्त एकच मंदिर पूर्णपणे पाहू शकले ते म्हणजे वरधराज पेरूमल मंदिर.
वरधराज पेरूमल मंदिर "पेरूमल कोइल" या नावाने ओळखले जाते. "कोइल" म्हणजे देऊळ आणि "मलय" (पेरू'मल') म्हणजे "टेकडी".
बस मधून जातानाच हे मंदिर आपल्या नजरेस पडते. मंदिरा भोवतालची भली मोठी भिंत आणि कळस दुरूनच आपल्याला दिसतो.आजूबाजूला खूप सारे पोपट शाळा भरल्याप्रमाणे विजेच्या तारांवर एका रांगेत बसून असलेले दिसतात.
हे मंदिर २३ एकर मध्ये वसलेले आहे.या मंदिरातील मांडणी विश्वकर्मा स्थापत्यकलेवर आधारित आहे. तेथील मूर्तींची कलाकुसर अजूनही उत्तम स्थितीत आहे. या मंदिराचे ३ उप-प्रकार आहेत : अझवार, मडाई पल्ली आणि थिरु मलई. मंदिरात ३२ देवळे, १९ ध्वजस्तंभ आणि ३८९ खांब असलेला सभामंडप (सिंहाची मूर्ती असलेला / याली प्रकारातील मूर्ती) आणि तलाव आहेत.येथील वैशिष्ट्य म्हणजे एकाच दगडातून कोरलेली भली मोठी दगडी साखळी. मंदिरातील मुख्य मूर्तीशिवाय येथे वरधराज स्वामींची लाकडामध्ये कोरलेली मूर्ती एका चांदीच्या खोक्यात ठेवलेली आहे. त्यामधून दर ४० वर्षांनी पाणी काढून टाकण्यात येते. (मला या पाण्याचा काही संदर्भ लागला नाही.) नरसिंहाच्या मूर्तीवर एक मुखवटा आहे. तो मुखवटा रहस्यमय असल्याचे मानण्यात येते. त्या मुखवट्यामध्ये गूढ शक्ती वास करते असा येथील लोकांचा समज आहे.
भगवान विष्णू सगळ्यांच्या मनोकामना ऐकून घेतात आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून विष्णूला "वरदार" (देणारा) असे नाव देण्यात आले आहे.
देवळामध्ये खूप मोठ्या छत्र्या आहेत,एका वेळेस एका माणसाला त्या उचलणे अवघड जाते. गाभाऱ्यात प्रवेश करण्याचे मार्ग एवढे चिंचोळे आहेत कि एखादा जाड माणूस अडकला तर एकंदर परिस्थिती अवघड होऊन बसेल.
या देवळातील व्यवस्थापन मात्र खूप खराब आहे. देवळात जाताना घेतलेला नारळ आणि फुले देवळातून बाहेर पडले तरी नक्की कुठे द्यायचे याचा अजिबात मागमूस लागला नाही. शेवटी तसेच घरी घेऊन यावे लागले.
मंदिरातील एकंदर वातावरण मला तरी फार काही भावले नाही. दर्शनासाठी रांगेत उभे असताना माझ्या समोरील एक जोडपे जे काही करत होते त्यावरून क्षणभर आपण नक्की देवळात उभे आहोत कि सारसबाग मध्ये असा विचार मनात येउन गेला.
देवळात सुद्धा ज्यांना वासना दूर ठेवता येत नाहीत अशांना देव कधी कळला असेल का???
देवळात एके ठिकाणी सोने आणि चांदीची पाल भिंतीवर लावलेली आहे.इंद्राने माता लक्ष्मीच्या शापातून मुक्त झाल्यावर या पाली वाहिल्या असे मानले जाते.
२ रु. चे तिकीट काढून शिडीवर चढून त्या पालींना हात लावला कि तुमची पापे धुवून निघतात. संपूर्ण चेन्नई मधेच एवढ्या पाली आहेत, विशेषत: माझ्या घरात त्यांचा असा काही मुक्त वावर आहे कि मला नक्की खात्री आहे कि मी आणि माझ्या पुढच्या असंख्य पिढ्या पापमुक्त झाल्यात.
देवळाच्या आवारात एकेठिकाणी प्रसाद विकत मिळतो. १०० रु. मध्ये गोड, तिखट आणि दही अशा ३ प्रकारचे भात, पापड, मोठी चकली, लाडू, अनारसा असा भरपूर प्रसाद दिला जातो, कि वेगळे जेवण जेवण्याची गरज उरत नाही.
या वेळेस हे एकच देऊळ पाहून झाले. पुढच्या भेटीत इतर देवळांना भेटी देऊन देवाला भक्तांचे दर्शन होते का ते पाहूया.
..........................
चूकभूल द्यावीघ्यावी.
(source of information friends and of course Mr.Google )
All rights are reserved by Sujata Pohekar.
धड़कन
उनकी धड़कन चलती थी जबतक
मेरे लफ़्ज़ सांस लेते थे
.......................... ......................अस्म ित
मेरे लफ़्ज़ सांस लेते थे
..........................
कॅलिडोस्कोप : 2 उन्हाळा आणि आजोबा
कॅलिडोस्कोप : 2
उन्हाळा आणि आजोबा
उन्हाळ्याची सुट्टीतील आणखीन एक गंमत म्हणजे आज्जी-आजोबांच्या घरी जाऊन राहणे. म्हणायला आमचं कुटुंब एकत्र असले तरी, कामाच्या निमित्ताने आणि शाळेच्या सोयीसाठी सगळे वेगवेगळ्या ठिकाणी रहातो.
आज्जी-आजोबांच्या घरी गेलो कि दर उन्हाळ्यात हमखास केली जाणारी गोष्ट म्हणजे आईस्क्रीम, भेळ , कलिंगड, घरच्या आवळा / लिंबाचे सरबत या सगळ्यांची एक-एक दिवस पार्टी.
आमचे आजोबा (आम्ही त्यांना "दादा" म्हणतो) आमच्या घरातील सगळ्यात जास्त उत्साही प्राणी. आम्ही सगळी भावंडे जमलो कि साधारण ४ च्या सुमाराला पार्टीची सुरुवात व्हायची. एक दिवस आईस्क्रीम तर दुसरा दिवस कलिंगडाचा नाहीतर भेळीचा. आईस्क्रीम सारखी गोष्ट कप विकत घेऊन खाणे हे दादांना कधी पसंत नसावे किंवा बहुदा ते त्यांना मान्यच नसावे कदाचिद. कारण आईस्क्रीमवाला आला कि दादा आम्हाला कोणालाही न कळविता त्या आईस्क्रीमवाल्याकडून एक अख्खा कॅन घेऊन यायचे. कधीकधी तर ३ वेगळ्या आईस्क्रीमचे ३ कॅन आणत असत.हि आईस्क्रीम कोणतीही ब्रॅण्डेड आईस्क्रीम नसायची, तर लाकडी आईस्क्रीम पॉट वापरून घरी तयार केलेली टिपिकल गुलाबी, पिस्ता आणि आंबा कलर असणारी होती.आणि तिचा स्वाद त्याच्या सोबतच्या पानामुळेच चांगला लागतो असा माझा अजूनही विश्वास आहे(ती पाने कोणत्या झाडाची होती त्याबद्दल मला काही माहित नाही.) घरात जाऊन हाताला जे लागेल ते भांडे आणि चमचा घेऊन आईस्क्रीम खायला आमची लगबग सुरु व्हायची.आमची आईस्क्रीम पंगत संपेपर्यंत तो आईस्क्रीमवाला जिन्याखाली मस्त ताणून द्यायचा.
कलिंगड खाताना पण थोड्याफार फरकाने हे असेच चालायचे. सकाळी कलिंगड आणले कि ते बादलीत बुडवून ठेवायचे, म्हणजे ते दुपारपर्यंत गार व्हायचे. आणि दुपारच्या झोपा झाल्या कि दादा ते कलिंगड व्यवस्थित तुकडे करून, बिया काढून, त्यावर मीठ टाकून तयार ठेवायचे. त्यावेळी घरात काटे चमच्यांचे फारसे प्रस्थ नव्हते. घरात एकुलताएक छोटासा, २ काटे असणारा चमचा होता. कोणाच्याही नकळत, आधीच तो चमचा आपल्याकडे कोण घेतंय यावरून आमची चुरस लागायची. ज्याला तो चमचा मिळायचा तो विजयी वीर स्वतःचे खाऊन झाले कि दुसऱ्यांना देणार अथवा दादांची दुसरी युक्ती म्हणजे टाचणीच्या टोकाने कलिंगड उचलून खायचे.पपई, ताडगोळे असेच टाचणीच्या टोकाने उचलून खाल्ल्याचे स्मरते.
जिलेबी,मैसूरपाक,पापडी, आज्जीने केलेले ढोकळे,डोसे,मेदूवडे असे कितीतरी पदार्थ असायचे. ज्या कुठल्या पदार्थाची पार्टी असायची तो सगळ्यांना पोटभर होईल असाच आणला अथवा बनविला जायचा.
आणि या सगळ्या आनंदाच्या वरचा कहर म्हणजे रात्री गच्चीत (वरचे माजले बांधले नसल्याने घराच्या या भागाला गच्ची म्हणावे कि नाही ते तुम्हीच ठरवा) जाऊन रेल्वेडब्या प्रमाणे झोपणे ते सुद्धा दादांकडून गोष्टी ऐकत.त्यांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे "आत्ता होती कुठे गेली?". आजही त्यांना गोष्ट सांगा म्हणाले तर ते नक्की हि गोष्ट सांगतील याची पक्की खात्री आहे.
आजोबा आणि आमची वये वाढलीयेत. त्यांचा उत्साह तोच आहे आणि आमच्यातील बालपण सुद्धा तसेच आहे अजूनही…फक्त उन्हाळ्याची सुट्टी कधी मिळतेय याची वाट पाहतोय.
.......................... ..अस्मित
उन्हाळा आणि आजोबा
उन्हाळ्याची सुट्टीतील आणखीन एक गंमत म्हणजे आज्जी-आजोबांच्या घरी जाऊन राहणे. म्हणायला आमचं कुटुंब एकत्र असले तरी, कामाच्या निमित्ताने आणि शाळेच्या सोयीसाठी सगळे वेगवेगळ्या ठिकाणी रहातो.
आज्जी-आजोबांच्या घरी गेलो कि दर उन्हाळ्यात हमखास केली जाणारी गोष्ट म्हणजे आईस्क्रीम, भेळ , कलिंगड, घरच्या आवळा / लिंबाचे सरबत या सगळ्यांची एक-एक दिवस पार्टी.
आमचे आजोबा (आम्ही त्यांना "दादा" म्हणतो) आमच्या घरातील सगळ्यात जास्त उत्साही प्राणी. आम्ही सगळी भावंडे जमलो कि साधारण ४ च्या सुमाराला पार्टीची सुरुवात व्हायची. एक दिवस आईस्क्रीम तर दुसरा दिवस कलिंगडाचा नाहीतर भेळीचा. आईस्क्रीम सारखी गोष्ट कप विकत घेऊन खाणे हे दादांना कधी पसंत नसावे किंवा बहुदा ते त्यांना मान्यच नसावे कदाचिद. कारण आईस्क्रीमवाला आला कि दादा आम्हाला कोणालाही न कळविता त्या आईस्क्रीमवाल्याकडून एक अख्खा कॅन घेऊन यायचे. कधीकधी तर ३ वेगळ्या आईस्क्रीमचे ३ कॅन आणत असत.हि आईस्क्रीम कोणतीही ब्रॅण्डेड आईस्क्रीम नसायची, तर लाकडी आईस्क्रीम पॉट वापरून घरी तयार केलेली टिपिकल गुलाबी, पिस्ता आणि आंबा कलर असणारी होती.आणि तिचा स्वाद त्याच्या सोबतच्या पानामुळेच चांगला लागतो असा माझा अजूनही विश्वास आहे(ती पाने कोणत्या झाडाची होती त्याबद्दल मला काही माहित नाही.) घरात जाऊन हाताला जे लागेल ते भांडे आणि चमचा घेऊन आईस्क्रीम खायला आमची लगबग सुरु व्हायची.आमची आईस्क्रीम पंगत संपेपर्यंत तो आईस्क्रीमवाला जिन्याखाली मस्त ताणून द्यायचा.
कलिंगड खाताना पण थोड्याफार फरकाने हे असेच चालायचे. सकाळी कलिंगड आणले कि ते बादलीत बुडवून ठेवायचे, म्हणजे ते दुपारपर्यंत गार व्हायचे. आणि दुपारच्या झोपा झाल्या कि दादा ते कलिंगड व्यवस्थित तुकडे करून, बिया काढून, त्यावर मीठ टाकून तयार ठेवायचे. त्यावेळी घरात काटे चमच्यांचे फारसे प्रस्थ नव्हते. घरात एकुलताएक छोटासा, २ काटे असणारा चमचा होता. कोणाच्याही नकळत, आधीच तो चमचा आपल्याकडे कोण घेतंय यावरून आमची चुरस लागायची. ज्याला तो चमचा मिळायचा तो विजयी वीर स्वतःचे खाऊन झाले कि दुसऱ्यांना देणार अथवा दादांची दुसरी युक्ती म्हणजे टाचणीच्या टोकाने कलिंगड उचलून खायचे.पपई, ताडगोळे असेच टाचणीच्या टोकाने उचलून खाल्ल्याचे स्मरते.
जिलेबी,मैसूरपाक,पापडी, आज्जीने केलेले ढोकळे,डोसे,मेदूवडे असे कितीतरी पदार्थ असायचे. ज्या कुठल्या पदार्थाची पार्टी असायची तो सगळ्यांना पोटभर होईल असाच आणला अथवा बनविला जायचा.
आणि या सगळ्या आनंदाच्या वरचा कहर म्हणजे रात्री गच्चीत (वरचे माजले बांधले नसल्याने घराच्या या भागाला गच्ची म्हणावे कि नाही ते तुम्हीच ठरवा) जाऊन रेल्वेडब्या प्रमाणे झोपणे ते सुद्धा दादांकडून गोष्टी ऐकत.त्यांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे "आत्ता होती कुठे गेली?". आजही त्यांना गोष्ट सांगा म्हणाले तर ते नक्की हि गोष्ट सांगतील याची पक्की खात्री आहे.
आजोबा आणि आमची वये वाढलीयेत. त्यांचा उत्साह तोच आहे आणि आमच्यातील बालपण सुद्धा तसेच आहे अजूनही…फक्त उन्हाळ्याची सुट्टी कधी मिळतेय याची वाट पाहतोय.
..........................
पहिला कॅलिडोस्कोप "आठवणींचा"
पहिला कॅलिडोस्कोप "आठवणींचा"
चेन्नईला येउन दीड वर्ष उलटले.एका नोकरीमध्ये स्थिर होईपर्यंत दुसरी नोकरी शोधली.
नवीन ठिकाणी जाताच तिथून पुढे गावाला जाण्याची मिळालेली संधी (गावाला म्हणजे जपानला ) आणि गेल्या महिन्या पर्यंत असलेला कामाचा ताण.
या सगळ्यामध्ये वाचन, लिखाण करायला पुरेसा वेळ देत न आल्याची खंत लागली होती. आणि खंत म्हणजे तरी किती…तर लिहायला काही सुचत नव्हते म्हणून अगदी
अस्वस्थ वाटू लागले.त्या अस्वस्थतेत घराबाहेर पडले, खूप दूरवर चालत गेले. नशिबाने बाहेर हलका पाऊस आणि मस्त थंड वातावरण होते.
अचानक एक कल्पना सुचली. चालता चालता शब्दांची जुळवाजुळव सुरु झाली.लेखणीला शब्दांचे श्वास मिळाले आणि अस्वस्थता मागे पडली.
झरझर आठवणी रिंगण धरू लागल्या.................थे ट बालपणापासूनच्या.
लहानपणी(म्हणजे शाळेत जायच्या वयात) उन्हाळ्याची सुट्टी लागली कि माझे वडील त्यांच्या शाळेच्या वाचनालयातून पुस्तके आणायचे.(माझे वडील ज्या शाळेत शिक्षक होते
तेथील प्रयोगशाळा, पोहण्याचा तलाव आणि वाचनालय यावर आमचा पूर्ण हक्क आहे असेच वाटायचे मला).पुस्तके म्हणजे २-३ नव्हे तर साधारण एक पिशवीभर तरी
वेगवेगळ्या विषयांची, वजनांची, रंगांची शिदोरी असायची.हातात येईल ते पुस्तक शक्य तेवढ्या लवकर वाचून काढायचे आणि परत दुसऱ्या पुस्तकांची मागणी करून ठेवायची हे
आम्हा भावंडांचे ठरलेले उद्योग होते.
लहानपणी फार काही कळत नसले तरी मोठे झाल्यावर या लागलेल्या (किंवा लावलेल्या) चांगल्या सवयीचा फायदा समजून आला आणि त्यासाठी मी माझ्या आई-वडिलांची नेहमीच ऋणी राहीन.
वाचन हे फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीपुरतेच मर्यादित होते असे नाही. तर बालवाडी पासून ते महाविद्यालाच्या अभ्यासक्रमातील मराठी भाषेची सगळी पुस्तके मिळतील तेव्हां वाचायची.
पूर्वी वाणसामान आणले आणि ते डब्यांमधून भरून झाले कि त्या सोबत आलेले वर्तमानपत्राचे तुकडे, नवरात्रीमध्ये वाटलेल्या महालक्ष्मिच्या व्रताची पुस्तके, बाहेरील देशांची अनुवादित पुस्तके सगळे काही वाचून काढायचे.
चौघीजणी, ययाती, महानायक, माईन काम्फ इ. इ. बरीच पुस्तके वाचण्याच्या आनंदापेक्षा वाचून संपल्याचे दु:ख जास्त व्हायचे.म्हणून मग परत परत तीच पुस्तके वाचून काढायचे.आवडलेले परिच्छेद डायरीत उतरवून घ्यायचे. अजूनही ती डायरी सांभाळून ठेवली आहे मी. कधीतरी सामान आवरताना नजरेस पडली कि वाचते.आमच्या घराजवळ मॅजेस्टिक प्रकाशनची इमारत आहे. त्यांच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुस्तक प्रदर्शन असायचे. दिवसभर तेथे बसून हवी ती पुस्तके वाचण्याचे समाधान काही औरच असायचे.
पुस्तकांवर पेनने खाणाखुणा करून, त्यावर वरण-भात, भाजीचे, तेलाचे असे कोणत्याही प्रकारचे डाग पाडून अथवा खूण म्हणून पानाचे कोपरे दुमडून पुस्तकांना विद्रूप करणारे करंटे पाहिले कि माझे डोके आऊट झालेच म्हणून समजा. एक तर हे महाभाग पुस्तके कधी स्वतः विकत घेणार नाहीत आणि दुसऱ्यांची पुस्तके घाण करून निर्लज्ज मनाने परत करतील.९ वीत असताना जंगम आडनावाची माझी एक मैत्रीण होती. एकदा तिने संस्कृतच्या तासाला माझ्या पुस्तकावर पेनने एका ओळीखाली रेघ मारली. माझा पारा जो चढला, कि त्या रागाच्या भरात खोडरबरने ती पेनची रेघ खोडत असताना पुस्तकावरची अक्षरे पण खोडली जाऊ लागली याकडे माझे लक्षच गेले नाही.त्या दिवसानंतर माझ्या मैत्रिणीने माझ्या पुस्तकावर पेनच काय पण साधे डोळे लावण्याचेही कष्ट घेतले नसावेत बहुदा.
पुस्तकांच्या बाबतीत मी खूपच स्वार्थी आहे. म्हणजे असे कि, घरात आणलेले कोणतेही पुस्तक आधी मला मिळाले पाहिजे असा माझा हट्ट असायचा. आणि माझे वाचून संपले कि ते वाचनालयातून लगेच बदलून आणायचे, मग घरातील इतर व्यक्तींना अजून ते वाचायचे आहे याचा विचार देखील माझ्या मनात येत नसायचा.त्यामुळे माझी आई आणि बहिण बरेचदा माझ्यावर रागवायच्या.
कोणतेही पुस्तक वाचताना त्या त्या पुस्तकांचे नायकनायिका मनावर राज्य करून असायचे. उदा. शिवाजी महाराज, पेशवे, कर्ण, चौघीजणी मधल्या चारही बहिणी सगळे काही आपणच आहोत असे वाटत राहायचे. बर्मुडा ट्राइॅंगल आणि एक चुंबकीय प्रयोग करून लोक गायब करण्या विषयीचे एक पुस्तक वाचले(नाव लक्षात नाही आता) तेव्हां मी आणि माझा भाऊ मनातून खूप घाबरलेले होतो.मनात यायचे कि आपणही असेच गायब झालो तर....असो.
अशाच आणखी खूप आठवणी आहेत पुस्तकांच्या. सगळ्याच लिहायला लागले तर कॅलिडोस्कोप चा दुसरा रंग आणि आकार पाहता येणार नाही.म्हणून हा भाग इथेच थांबवू.
: अस्मित
चेन्नईला येउन दीड वर्ष उलटले.एका नोकरीमध्ये स्थिर होईपर्यंत दुसरी नोकरी शोधली.
नवीन ठिकाणी जाताच तिथून पुढे गावाला जाण्याची मिळालेली संधी (गावाला म्हणजे जपानला ) आणि गेल्या महिन्या पर्यंत असलेला कामाचा ताण.
या सगळ्यामध्ये वाचन, लिखाण करायला पुरेसा वेळ देत न आल्याची खंत लागली होती. आणि खंत म्हणजे तरी किती…तर लिहायला काही सुचत नव्हते म्हणून अगदी
अस्वस्थ वाटू लागले.त्या अस्वस्थतेत घराबाहेर पडले, खूप दूरवर चालत गेले. नशिबाने बाहेर हलका पाऊस आणि मस्त थंड वातावरण होते.
अचानक एक कल्पना सुचली. चालता चालता शब्दांची जुळवाजुळव सुरु झाली.लेखणीला शब्दांचे श्वास मिळाले आणि अस्वस्थता मागे पडली.
झरझर आठवणी रिंगण धरू लागल्या.................थे
लहानपणी(म्हणजे शाळेत जायच्या वयात) उन्हाळ्याची सुट्टी लागली कि माझे वडील त्यांच्या शाळेच्या वाचनालयातून पुस्तके आणायचे.(माझे वडील ज्या शाळेत शिक्षक होते
तेथील प्रयोगशाळा, पोहण्याचा तलाव आणि वाचनालय यावर आमचा पूर्ण हक्क आहे असेच वाटायचे मला).पुस्तके म्हणजे २-३ नव्हे तर साधारण एक पिशवीभर तरी
वेगवेगळ्या विषयांची, वजनांची, रंगांची शिदोरी असायची.हातात येईल ते पुस्तक शक्य तेवढ्या लवकर वाचून काढायचे आणि परत दुसऱ्या पुस्तकांची मागणी करून ठेवायची हे
आम्हा भावंडांचे ठरलेले उद्योग होते.
लहानपणी फार काही कळत नसले तरी मोठे झाल्यावर या लागलेल्या (किंवा लावलेल्या) चांगल्या सवयीचा फायदा समजून आला आणि त्यासाठी मी माझ्या आई-वडिलांची नेहमीच ऋणी राहीन.
वाचन हे फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीपुरतेच मर्यादित होते असे नाही. तर बालवाडी पासून ते महाविद्यालाच्या अभ्यासक्रमातील मराठी भाषेची सगळी पुस्तके मिळतील तेव्हां वाचायची.
पूर्वी वाणसामान आणले आणि ते डब्यांमधून भरून झाले कि त्या सोबत आलेले वर्तमानपत्राचे तुकडे, नवरात्रीमध्ये वाटलेल्या महालक्ष्मिच्या व्रताची पुस्तके, बाहेरील देशांची अनुवादित पुस्तके सगळे काही वाचून काढायचे.
चौघीजणी, ययाती, महानायक, माईन काम्फ इ. इ. बरीच पुस्तके वाचण्याच्या आनंदापेक्षा वाचून संपल्याचे दु:ख जास्त व्हायचे.म्हणून मग परत परत तीच पुस्तके वाचून काढायचे.आवडलेले परिच्छेद डायरीत उतरवून घ्यायचे. अजूनही ती डायरी सांभाळून ठेवली आहे मी. कधीतरी सामान आवरताना नजरेस पडली कि वाचते.आमच्या घराजवळ मॅजेस्टिक प्रकाशनची इमारत आहे. त्यांच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुस्तक प्रदर्शन असायचे. दिवसभर तेथे बसून हवी ती पुस्तके वाचण्याचे समाधान काही औरच असायचे.
पुस्तकांवर पेनने खाणाखुणा करून, त्यावर वरण-भात, भाजीचे, तेलाचे असे कोणत्याही प्रकारचे डाग पाडून अथवा खूण म्हणून पानाचे कोपरे दुमडून पुस्तकांना विद्रूप करणारे करंटे पाहिले कि माझे डोके आऊट झालेच म्हणून समजा. एक तर हे महाभाग पुस्तके कधी स्वतः विकत घेणार नाहीत आणि दुसऱ्यांची पुस्तके घाण करून निर्लज्ज मनाने परत करतील.९ वीत असताना जंगम आडनावाची माझी एक मैत्रीण होती. एकदा तिने संस्कृतच्या तासाला माझ्या पुस्तकावर पेनने एका ओळीखाली रेघ मारली. माझा पारा जो चढला, कि त्या रागाच्या भरात खोडरबरने ती पेनची रेघ खोडत असताना पुस्तकावरची अक्षरे पण खोडली जाऊ लागली याकडे माझे लक्षच गेले नाही.त्या दिवसानंतर माझ्या मैत्रिणीने माझ्या पुस्तकावर पेनच काय पण साधे डोळे लावण्याचेही कष्ट घेतले नसावेत बहुदा.
पुस्तकांच्या बाबतीत मी खूपच स्वार्थी आहे. म्हणजे असे कि, घरात आणलेले कोणतेही पुस्तक आधी मला मिळाले पाहिजे असा माझा हट्ट असायचा. आणि माझे वाचून संपले कि ते वाचनालयातून लगेच बदलून आणायचे, मग घरातील इतर व्यक्तींना अजून ते वाचायचे आहे याचा विचार देखील माझ्या मनात येत नसायचा.त्यामुळे माझी आई आणि बहिण बरेचदा माझ्यावर रागवायच्या.
कोणतेही पुस्तक वाचताना त्या त्या पुस्तकांचे नायकनायिका मनावर राज्य करून असायचे. उदा. शिवाजी महाराज, पेशवे, कर्ण, चौघीजणी मधल्या चारही बहिणी सगळे काही आपणच आहोत असे वाटत राहायचे. बर्मुडा ट्राइॅंगल आणि एक चुंबकीय प्रयोग करून लोक गायब करण्या विषयीचे एक पुस्तक वाचले(नाव लक्षात नाही आता) तेव्हां मी आणि माझा भाऊ मनातून खूप घाबरलेले होतो.मनात यायचे कि आपणही असेच गायब झालो तर....असो.
अशाच आणखी खूप आठवणी आहेत पुस्तकांच्या. सगळ्याच लिहायला लागले तर कॅलिडोस्कोप चा दुसरा रंग आणि आकार पाहता येणार नाही.म्हणून हा भाग इथेच थांबवू.
: अस्मित
"कॅलिडोस्कोप"
"कॅलिडोस्कोप",
बरेचजण लहानपणी हा खेळ खेळले असतील. विविध रंग, निरनिराळे आकार आणि
प्रकाशाचा अनोखा खेळ.कित्येक तास तुम्हाला गुंगवून ठेवणारा.
सरत्या काळात तो कॅलिडोस्कोप कुठेतरी धूळ खात पडलेला असतो, परंतु त्याचा खेळ आपण आयुष्यभर खेळत राहतो…. इतर माणसांसोबत…स्वतः सोबत.
क्षणक्षणाला बदलत जाणारे जग, बदलणारी माणसे, भावना आणि विचारांच्या प्रवाहात विखुरलेले आपण. सार जग एका कॅलिडोस्कोप सारखं, बदल आणि सातत्य यांचा हवाहवासा संगम.
या कॅलिडोस्कोपसारख मी मनात तयार होणाऱ्या विचार, भावना, आठवणींचे असंख्य आकार शब्दांच्या रुपात कागदावर उतरविणार आहे.
पाहू, तुम्हाला किती आवडतोय हा
"कॅलिडोस्कोप" : माझा (विचार,आठवणी आणि भावना, नात्यांचा.)
.......................... .......अस्मित
सरत्या काळात तो कॅलिडोस्कोप कुठेतरी धूळ खात पडलेला असतो, परंतु त्याचा खेळ आपण आयुष्यभर खेळत राहतो…. इतर माणसांसोबत…स्वतः सोबत.
क्षणक्षणाला बदलत जाणारे जग, बदलणारी माणसे, भावना आणि विचारांच्या प्रवाहात विखुरलेले आपण. सार जग एका कॅलिडोस्कोप सारखं, बदल आणि सातत्य यांचा हवाहवासा संगम.
या कॅलिडोस्कोपसारख मी मनात तयार होणाऱ्या विचार, भावना, आठवणींचे असंख्य आकार शब्दांच्या रुपात कागदावर उतरविणार आहे.
पाहू, तुम्हाला किती आवडतोय हा
"कॅलिडोस्कोप" : माझा (विचार,आठवणी आणि भावना, नात्यांचा.)
..........................
"कल्हईवाला"
आमच्या घरातील पितळीची भांडी पाहिली कि मला हमखास एका व्यक्तीची आठवण येते.
माझ्या लहानपणी (तसे माझे वय फार नाहीये, तरीपण सुरुवात काय करावी हे न समजल्याने आणि खरंच हि गोष्ट लहानपणीची असल्याने पर्याय नव्हता... असो.)
तर, लहानपणी आम्ही ज्या ठिकाणी राहायचो तेथे एक "कल्हईवाला"यायचा.बुटका, थुलथुलीत शरीरयष्टी, मोठा उभट गोल चेहरा, गरगरीत डोळे आणि जगातील तमाम रंगाच्या कंपन्या झक मारतील अशी रंगाची ग्यारंटी असणारा असा वल्ली.याच्या नावाचा अथवा गावाचा कोणाला काही पत्ता नव्हता.तो कुठे राहतो, काय जेवतो, घरी कोण अशी कोणतीही माहिती कोणाला अवगत नव्हती. सगळ्यांसाठी तो फक्त एक "कल्हईवाला" होता.
दुपारच्या वेळेला "कल्हई....!" अशी जोरात आरोळी देत आमच्या गल्लीत याचा प्रवेश व्हायचा.पांढरा घोळदार लेंगा, फिकट अष्टगंधी रंगाचा कुडता असा त्याचा नेहमीचा वेश असायचा. या माणसाने कधी वेगळ्या रंगाचे कपडे घातल्याचे अजूनही स्मरत नाही.
एकदा का गल्लीत प्रवेश झाला कि भांड्यांना कल्हई करून घेण्यापासून ते लहान मुलांना भीती दाखविण्यासाठी याचा उपयोग करून घेण्यात येत असे. त्याचे एकंदर रूप आणि आवाज ऐकता मुलं घाबरून घरात लपून न बसतील तर नवलच.
हा आला कि आयांना कोण जाणे काय आनंद व्हायचा. "ओ कल्हईवाले आमच्या कार्ट्याला ओरडा जरा... जेवत नाहीये, नखे खातोय इ." असंख्य तक्रारी त्याच्या खाती जमा करून आपण मात्र मोकळ्या व्हायच्या.याने आपले लाल डोळे वटारताच मुले रडगाणी सुरु करणारच याची खात्री.या मानसला कधीही दारू पिलेला पहिला नाही परंतु,याचे डोळे नेहमी लाल असायचे.
गल्लीच्या सुरुवातीलाच एक पानाची टपरी होती(ती टपरी आणि पानवाला अजूनही आहे फक्त टपरीचे रूप कालपरत्वे ५ स्टार झालेय), त्या टपरी शेजारी याचे कल्हईचे दुकान मांडले जायचे. दुकान म्हणजे तरी काय..., जमिनीत खड्डा खणून त्यात लावलेली छोटी भट्टी, शेजारी पसरलेली भांडी,कल्हई झाल्यावर भांडे थंड करण्यासाठी पाणी इ.इ. भांड्यांना कल्हई करताना याच्या हाताला कसे भाजत नाही याचे उत्तर मला कधीही मिळाले नाही आणि त्याला विचारण्याची हिम्मत पण कधी झाली नाही.(कारण मी लहान होते न..मग मी पण घाबरायचेच कि त्याला...). कल्हई करताना येणारा पांढऱ्या धुराचा वास मला छान वाटायचा(बहुदा तो वास नवसागरचा असावा.).पितळी भांड्यांना कल्हई करून सोन्यासारखे चमकवण्याचे काम तो उत्तमरित्या पार पाडायचा.
पुढे काही वर्षांनी, गल्लीतील रस्ता नवीन झाला तेव्हां त्याचे पानाच्या टपरी शेजारील दुकान उचलून पुस्तके बाईंड करण्याच्या दुकानाजवळ हलविण्यात आले.त्यानंतर मात्र त्याचे क्वचितच येणे-जाणे असायचे.
कालपरत्वे पितळी भांडी गायब झाली,
आणि कल्हईवाला त्याच्या आरोळी सोबत.......
खरेतर मला घरची पितळी भांडी दिसली कि हा माणूस आठवतच नाही. कारण आम्ही कधी त्याच्याकडून कल्हई करून घेतल्याचे माझ्या स्मरणात नाही. हि वल्ली आठवण्याचे कारण म्हणजे माझ्या ऑफिस मधील एका व्यक्तीचे नाव याच्या नावाशी मिळतेजुळते आहे.....
........................अस ्मित
माझ्या लहानपणी (तसे माझे वय फार नाहीये, तरीपण सुरुवात काय करावी हे न समजल्याने आणि खरंच हि गोष्ट लहानपणीची असल्याने पर्याय नव्हता... असो.)
तर, लहानपणी आम्ही ज्या ठिकाणी राहायचो तेथे एक "कल्हईवाला"यायचा.बुटका, थुलथुलीत शरीरयष्टी, मोठा उभट गोल चेहरा, गरगरीत डोळे आणि जगातील तमाम रंगाच्या कंपन्या झक मारतील अशी रंगाची ग्यारंटी असणारा असा वल्ली.याच्या नावाचा अथवा गावाचा कोणाला काही पत्ता नव्हता.तो कुठे राहतो, काय जेवतो, घरी कोण अशी कोणतीही माहिती कोणाला अवगत नव्हती. सगळ्यांसाठी तो फक्त एक "कल्हईवाला" होता.
दुपारच्या वेळेला "कल्हई....!" अशी जोरात आरोळी देत आमच्या गल्लीत याचा प्रवेश व्हायचा.पांढरा घोळदार लेंगा, फिकट अष्टगंधी रंगाचा कुडता असा त्याचा नेहमीचा वेश असायचा. या माणसाने कधी वेगळ्या रंगाचे कपडे घातल्याचे अजूनही स्मरत नाही.
एकदा का गल्लीत प्रवेश झाला कि भांड्यांना कल्हई करून घेण्यापासून ते लहान मुलांना भीती दाखविण्यासाठी याचा उपयोग करून घेण्यात येत असे. त्याचे एकंदर रूप आणि आवाज ऐकता मुलं घाबरून घरात लपून न बसतील तर नवलच.
हा आला कि आयांना कोण जाणे काय आनंद व्हायचा. "ओ कल्हईवाले आमच्या कार्ट्याला ओरडा जरा... जेवत नाहीये, नखे खातोय इ." असंख्य तक्रारी त्याच्या खाती जमा करून आपण मात्र मोकळ्या व्हायच्या.याने आपले लाल डोळे वटारताच मुले रडगाणी सुरु करणारच याची खात्री.या मानसला कधीही दारू पिलेला पहिला नाही परंतु,याचे डोळे नेहमी लाल असायचे.
गल्लीच्या सुरुवातीलाच एक पानाची टपरी होती(ती टपरी आणि पानवाला अजूनही आहे फक्त टपरीचे रूप कालपरत्वे ५ स्टार झालेय), त्या टपरी शेजारी याचे कल्हईचे दुकान मांडले जायचे. दुकान म्हणजे तरी काय..., जमिनीत खड्डा खणून त्यात लावलेली छोटी भट्टी, शेजारी पसरलेली भांडी,कल्हई झाल्यावर भांडे थंड करण्यासाठी पाणी इ.इ. भांड्यांना कल्हई करताना याच्या हाताला कसे भाजत नाही याचे उत्तर मला कधीही मिळाले नाही आणि त्याला विचारण्याची हिम्मत पण कधी झाली नाही.(कारण मी लहान होते न..मग मी पण घाबरायचेच कि त्याला...). कल्हई करताना येणारा पांढऱ्या धुराचा वास मला छान वाटायचा(बहुदा तो वास नवसागरचा असावा.).पितळी भांड्यांना कल्हई करून सोन्यासारखे चमकवण्याचे काम तो उत्तमरित्या पार पाडायचा.
पुढे काही वर्षांनी, गल्लीतील रस्ता नवीन झाला तेव्हां त्याचे पानाच्या टपरी शेजारील दुकान उचलून पुस्तके बाईंड करण्याच्या दुकानाजवळ हलविण्यात आले.त्यानंतर मात्र त्याचे क्वचितच येणे-जाणे असायचे.
कालपरत्वे पितळी भांडी गायब झाली,
आणि कल्हईवाला त्याच्या आरोळी सोबत.......
खरेतर मला घरची पितळी भांडी दिसली कि हा माणूस आठवतच नाही. कारण आम्ही कधी त्याच्याकडून कल्हई करून घेतल्याचे माझ्या स्मरणात नाही. हि वल्ली आठवण्याचे कारण म्हणजे माझ्या ऑफिस मधील एका व्यक्तीचे नाव याच्या नावाशी मिळतेजुळते आहे.....
........................अस
रविवार, ७ एप्रिल, २०१३
मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२
समुद्र................७
तू फक्त माझा सखा....
माझ्या जन्मापासून सगळ्या क्षणात साथ देणारा.......
माझे पहिले पाऊल तुझ्याच दिशेने....
खूप आवडायचास मला...आवडतोस......अजूनही.......................
मैत्री आपली कित्ती घट्ट ......
तुला आठवतंय......पहिल्यांदा तुझ्या पाण्यात शिरले........किती खारट केले होतेस मला.....
पण त्या खारटपणातील प्रेम जाणवायचे.....जाणवते......अजूनही.......
कित्ती सुंदर रंग, जीव आहे तुझ्या पोटात.....कुठून निर्माण करतोस हे जग...???
एकदम अवर्णनीय.........आपलेसे.....
मला आठवतंय...आई सांगायची..........बाहेरून आल कि पाण्याने पाय का धुवायचे ते.....
कित्येकांची पापे तू स्वतःच्या पोटात सामावून घेतलीस......
खरच कसे जमते तुला....पवित्र राहायला.......
काल गप्पा मारताना म्हणालास.....कि मी अनाकलनीय आहे......
मला समजून घेणारा तेवढाच समजूतदार असायला हवा............
पण तुझ्याशिवाय..........
माझ्या भावना तुझ्या समोर मांडताना तुला बरोब्बर कळते माझे मन..............
मग तू एवढा निरंकार माझ्या जवळ असताना, आणखीन कोणी...............
तुझ्या डोळ्यातील समुद्र नेहमीच माझी साथ देतो.....तुझा प्रत्येक शब्द माझ्यासाठी धर्म असतो................
एक निर्गुण..............तू
....................................................................अस्मित
(माझी साता समुद्राची कहाणी..............सुफळ संपूर्ण)
रविवार, १६ डिसेंबर, २०१२
समुद्र ................६
तुझी मनातून होणारी घालमेल...समजतेय.....
कित्येक वर्षांचा त्रास....किती शांतपणे सहन केलास तू.....
आता इतके वर्षांनी तू घेतलेला तांडव अवतार....सगळ, काही क्षणातच शांत करणारा....
तुझ्या मनातील घुसमट अजस्त्र रूप धारण करून सर्व भूतलावर पसरवून शांत झालेला तू......
अगदी निरागस सौंदर्य......
तुझ्यातील जीवांचा माणसाने केलेला अंत, तुला ओरबाडलेल्या खुणा....सगळकाही परतवून टाकलेस.
तुझा राग नाही येत....वाईट वाटत राहते फक्त.....तुझ्या साठी काही करू न शकल्याचे.....
तुला ओरबाडण्यात आपणही सामील होतो...आहोत याचे.......
माफ करशील...........?
.......................................सर्वांना?
..........................
शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२
समुद्र..................५
ही ही ही ही........
अरे बास...
किती छळशील.....
बघ परत मोडलंस ना....
तुला कंटाळा नाही येत.....
घर मोडण्याचा....
घरात थोड पाणी दाखवावे म्हणून तुला आत येण्याची परवानगी देते, तर तुझ आपलं नेहमी सारखच...
मोडण.......
स्वतःच्या पोटात एवढ सगळं ठेवतोस, आणि जरा कुठे तुला लहान करून दुसऱ्याच्या दारात जागा देऊ केली तर तुझ लगेच उधळवून टाकण...
कधीतरी तळ्यासारखा होऊन पहा...........
गोड पाणी ,छोटासाच............
चिखलात कमळ फुलवणे काय असत ते कळेल तुला.................
नाहीतर मला घेऊन जा न,....आत...गर्द निळ्या रंगात....................
म्हणजे माझ घर कधीच मोडणार नाही.................
तुलाही ते जमणार नाही....
हा हा हा.........अरे बास..........
माझ घर मी स्वतःच मोडलं........
.............................. .............................. .............अस्मित
किती छळशील.....
बघ परत मोडलंस ना....
तुला कंटाळा नाही येत.....
घर मोडण्याचा....
घरात थोड पाणी दाखवावे म्हणून तुला आत येण्याची परवानगी देते, तर तुझ आपलं नेहमी सारखच...
मोडण.......
स्वतःच्या पोटात एवढ सगळं ठेवतोस, आणि जरा कुठे तुला लहान करून दुसऱ्याच्या दारात जागा देऊ केली तर तुझ लगेच उधळवून टाकण...
कधीतरी तळ्यासारखा होऊन पहा...........
गोड पाणी ,छोटासाच............
चिखलात कमळ फुलवणे काय असत ते कळेल तुला.................
नाहीतर मला घेऊन जा न,....आत...गर्द निळ्या रंगात....................
म्हणजे माझ घर कधीच मोडणार नाही.................
तुलाही ते जमणार नाही....
हा हा हा.........अरे बास..........
माझ घर मी स्वतःच मोडलं........
..............................
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)










