बुधवार, ३० मे, २०१२
नज़राना कबूल था.
शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११
कहा था...!!!!
कहा था तुमसे कोई याद छोड़ के मत जाना अपनी,
फिर भी जाते हुए तेरे पैरोंने अपने निशान बना दिए मेरे दिल पे.
क्यूँ दे गये अपना पता, जबकि उस घर में मेरा आना मना था.
भिजवा दिये वो ख़याल जिसमें तेरी खुशबू बसी थी,
लेकिन मेरे सासोंको पनाह देना तुम्हें नामंज़ूर था.
तुम्हारे हर एक सुर का अपने कानों में बसेरा बनाया था मैने
मेरी हर एक मैफिल को वीरान कर दिया तुमने
तुम दे गये मुझे जीने की वजह,
लेकिन मेरा मर जाना कबूल था तुम्हे - अस्मित
मीरा-मेघ-मी......
नेहमीच बरसत राहीले त्या एका रंगा साठी.....
तो मात्र अडकूनी राहिला राधा आणि रूक्मिणी साठी
मीरेचे विष भिनले त्याच्या कंठात....
सूर वाजत राहीले फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी
मेघ बनुनि शोध घेतला सागरतळि...
त्याने विरह चेतवत ठेवला क्षणोक्षणि...
ना सोडले एकटे कधी या अधुर्या मैफीलीत तरी.....
समोर असूनी अंतर राखले नंतर लाज बाळगण्यापरी....अस्मित
शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११
गुरुवार, ८ सप्टेंबर, २०११
सगळे एकाच......की.......वेगवेगळे........??????

जन्माला आल्यानंतर देहाला नाव देताना केलेला हवन,
आणि त्या सोबत असणारा अग्नी...
सर्वांच्या साक्षीने एकमेकांचे नाव घेताना
... समोर असलेला अग्नी.....
साखर-मधात घोळलेले शब्द , बकुळ-चंदनाने सुगंधलेले श्वास
दोन शरीर-आत्म्याना असलेली पूर्णत्वाची आस आणि तापलेला अग्नी.....
तुझ्या पासून दूर जाताना शेवटच्या क्षणांनी दिलेला अग्नी.........
सगळे एकाच......की.......वेगवेगळे........??????- अस्मित
सोमवार, २२ ऑगस्ट, २०११
तू आणि वादळ
खिडकीत उभे राहून वादळ झेलणारा तू..., तुझ्या मागे कुठेतरी उभी असलेली ती....
आणि दोघांमधे वाहत असलेली अनेक वर्ष......
दरवेळेस काही गोष्टी अपूर्ण ठेवल्याच पाहिजेत का?????
जीवनात पूर्णता ही कधीतरी हवीच की....
जे घडून गेल त्या बद्दल वाईट का वाटून घ्यायच...? जेव्हा थोपवता येत असताना हात मागे घेतले गेले.....
निर्णय स्वतःचेच, मग ते आता बोचू का लागले....?????
पुढे टाकलेल्या पावलाकडे मागे वळून का बघायच.....?
समोर उभ्या असलेल्या नवीन "ती" ला कधीच का नाही जवळ करायच....????
या पुढील तुज्या कविता कधीच अपूर्ण नसतील...
कारण तुझ्यावर येणारी वादळे "मी" अडवलेली असतील......: अस्मित
